शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

परभणी : शिक्षकांनीच सांगितली प्रश्नांची उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:14 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दोन्ही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे या केंद्रांवर भरारी किंवा बैठे पथकाला एकही कॉपी सापडलेली नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी/पेडगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दोन्ही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे या केंद्रांवर भरारी किंवा बैठे पथकाला एकही कॉपी सापडलेली नाही़जिल्ह्यातील ६० केंद्रांवर बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला़ या परीक्षेची तयारी शिक्षण विभागाच्या वतीने युद्ध पातळीवर करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सकाळी ११ वाजता इंग्रजी विषयाच्या पेपरला सुरुवात झाली़ परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्रावर एकूण ३०० तर बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर ३४७ विद्यार्थ्यांची परीक्षेच्या आसन व्यवस्थेची तयारी करण्यात आली होती़ पहिल्या दिवशी जि़प़ केंद्रावर २७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ २४ विद्यार्थी गैरहजर होते तर बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर ३१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ ३२ विद्यार्थी गैरहजर होते़दोन्ही परीक्षा केंद्रांवर काही वर्गामध्ये शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रकार समोर आला़ विशेष म्हणजे बैठे पथकातील कर्मचाऱ्यांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली़ दोन्ही परीक्षा केंद्रांमध्ये खाजगी व्यक्तींचाही वावर पहावयास मिळाला़ विशेष म्हणजे बिनदिक्कतपणे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे उघड होवूनही या दोन्ही केंद्रांवर भरारी व बैठे पथकाला एकही कॉपी आढळली नाही़ त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़ कॉपीच्या प्रकरणातून गतवर्षी येथील एका परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली होती़ तरीही यातून येथील काही शिक्षकांनी बोध घेतलेला दिसून येत नाही़ त्यामुळेच कॉपीचा प्रकार सुरु आहे.कॉपी करणाºया१५ विद्यार्थ्यांवर कारवाई४माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने या परीक्षेसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील कै़ रामकृष्ण बापू उच्च माध्यमिक विद्यालयात ९ तर सेलू येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ विद्यालयात १ आणि मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात ५ असे एकूण १५ परीक्षार्थी कॉप्या करताना आढळून आले़४त्यांच्यावर शिक्षण मंडळाच्या वतीने कारवाई करण्यात आली़ जिल्ह्यात इंग्रजी विषयासाठी २४ हजार १२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ त्यापैकी २३ हजार ३६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ ७६० विद्यार्थी गैरहजर होते़ परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी ६० बैठे पथक आणि ३३ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीexamपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक