शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कोल्हावाडी येथील आंबेगाव तलाव पडला कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:14 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील कोल्हावाडी येथील लघू पाटबंधारे विभागाचा आंबेगाव तलाव मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला आहे. तलाव आटल्याने या भागात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने भटकंती करावी लागत आहे. उन्हाळी हंगामातील बागायती पिके सलाईनवर गेली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील कोल्हावाडी येथील लघू पाटबंधारे विभागाचा आंबेगाव तलाव मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला आहे. तलाव आटल्याने या भागात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने भटकंती करावी लागत आहे. उन्हाळी हंगामातील बागायती पिके सलाईनवर गेली आहेत.मानवत तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जजन्यमान झाले. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली नाही. राज्य शासनाने मानवत तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे. ग्रामीण भागात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने बागायती पिकेही धोक्यात आली आहेत.तालुक्यातील कोल्हावाडी येथे लघू पाटबंधारे विभागांतर्गत आंबेगाव लघू तलाव आहे. या तलावावर तालुक्यातील कोल्हावाडी सोबतच कोल्हा, सोमठाणा, आटोळा या भागातील सिंचन शेती अवलंबून आहे. पाऊस कमी पडल्याने हा तलाव यावर्षी ३० टक्के भरला गेला होता. त्यामुळे सुरुवातीपासून पाणीटंचाई निर्माण होईल, असे चित्र होते. मार्च महिन्यापासून तलावातील पाणी मृत साठ्यात आले होते. एप्रिल महिन्यात तर हा तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आताच अशी परिस्थिती आहे. तर आणखी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने परिस्थिती खूपच गंभीर होणार असल्याचे दिसून येत आहे.पशूधनाची विक्री वाढलीआंबेगाव येथील तलाव आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालवधी आहे. पाण्यासाठीही जनावरांना भटकंती करावी लागत आहे. त्याचबरोबर मानवत तालुक्यातील कोल्हावाडी, आंबेगाव, सोमठाणा, आटोळा या शिवारात चाºयाची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. चारा आणि मूबलक पाणी मिळत नसल्याने पशूपालकांचा कल पशूधन विक्रीकडे असल्याचे दिसून येत आहे.परतीच्या पावसानेही फिरविली पाठदरवर्षी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी परिसरातील आंबेगाव तलाव परतीच्या पावसाने १०० टक्के भरतो. परंतु, यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने आंबेगाव तलावात मूबलक पाणीसाठी झाला नाही. परिणामी मार्च महिन्यातच हा तलाव कोरडाठाक पडला असून, परिसरातील टंचाई वाढली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प