शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

परभणी : कोल्हावाडी येथील आंबेगाव तलाव पडला कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:14 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील कोल्हावाडी येथील लघू पाटबंधारे विभागाचा आंबेगाव तलाव मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला आहे. तलाव आटल्याने या भागात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने भटकंती करावी लागत आहे. उन्हाळी हंगामातील बागायती पिके सलाईनवर गेली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील कोल्हावाडी येथील लघू पाटबंधारे विभागाचा आंबेगाव तलाव मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला आहे. तलाव आटल्याने या भागात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने भटकंती करावी लागत आहे. उन्हाळी हंगामातील बागायती पिके सलाईनवर गेली आहेत.मानवत तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जजन्यमान झाले. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली नाही. राज्य शासनाने मानवत तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे. ग्रामीण भागात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने बागायती पिकेही धोक्यात आली आहेत.तालुक्यातील कोल्हावाडी येथे लघू पाटबंधारे विभागांतर्गत आंबेगाव लघू तलाव आहे. या तलावावर तालुक्यातील कोल्हावाडी सोबतच कोल्हा, सोमठाणा, आटोळा या भागातील सिंचन शेती अवलंबून आहे. पाऊस कमी पडल्याने हा तलाव यावर्षी ३० टक्के भरला गेला होता. त्यामुळे सुरुवातीपासून पाणीटंचाई निर्माण होईल, असे चित्र होते. मार्च महिन्यापासून तलावातील पाणी मृत साठ्यात आले होते. एप्रिल महिन्यात तर हा तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आताच अशी परिस्थिती आहे. तर आणखी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने परिस्थिती खूपच गंभीर होणार असल्याचे दिसून येत आहे.पशूधनाची विक्री वाढलीआंबेगाव येथील तलाव आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालवधी आहे. पाण्यासाठीही जनावरांना भटकंती करावी लागत आहे. त्याचबरोबर मानवत तालुक्यातील कोल्हावाडी, आंबेगाव, सोमठाणा, आटोळा या शिवारात चाºयाची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. चारा आणि मूबलक पाणी मिळत नसल्याने पशूपालकांचा कल पशूधन विक्रीकडे असल्याचे दिसून येत आहे.परतीच्या पावसानेही फिरविली पाठदरवर्षी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी परिसरातील आंबेगाव तलाव परतीच्या पावसाने १०० टक्के भरतो. परंतु, यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने आंबेगाव तलावात मूबलक पाणीसाठी झाला नाही. परिणामी मार्च महिन्यातच हा तलाव कोरडाठाक पडला असून, परिसरातील टंचाई वाढली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प