शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सहा वर्षानंतर दुधना प्रकल्प मृत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:27 IST

अनेक शहरांसह दुधना नदी काठावरील शेकडो गावांची तहान भागविणारा निम्न दुधना प्रकल्प सहा वर्षांनंतर मृतसाठ्यात गेला आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढणार असून उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): अनेक शहरांसह दुधना नदी काठावरील शेकडो गावांची तहान भागविणारा निम्न दुधना प्रकल्प सहा वर्षांनंतर मृतसाठ्यात गेला आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढणार असून उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.दुधना प्रकल्पातून सेलू शहर तसेच जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा या शहारासह आठ गाव पाणी पुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच परभणी, पूर्णा या शहरांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. गतवर्षी दुधना प्रकल्पातून तीन वेळा नदीपात्राद्वारे पूर्णा शहरापर्यंत पाणी देण्यात आले. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा होऊ शकला नाही. त्यातच रबी हंगामातील पिकांसाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून दोन वेळा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. तसेच दुधनेच्या बॅक वॉटरमधून पिकांना पाणी देण्यासाठी बेसुमार पाणी उपसा अनेक दिवस सुरू होता. परिणामी प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा वेगाने कमी होत राहिला. दुधना प्रकल्पात २०१० मध्ये पाणी अडविण्यास सुरूवात झाली. त्यावेळी दोन्ही कालव्याची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे; परंतु, डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंचनासाठी पाणी देण्यात आले. उजव्या कालव्याचे अद्यापही काम अपूर्ण असले तरी ज्या ठिकाणापर्यंत काम पूर्ण आहे, त्या ठिकाणापर्यत पाणी सोडले जाते. अल्प पाऊस व पाण्याचा झालेला बेसुमार उपसा यामुळे २०१३ नंतर तब्बल सहा वर्षानंतर दुधना प्रकल्प मृत साठ्यात गेला आहे. परिणामी मंठा, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा या शहरांना प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दरम्यान, दुधनेतील पाणीसाठ्यावर शेतकरी अवलंबून असतात. टंचाईकाळात जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी दुधनेतून उपलब्ध केले जाते; परंतु, प्रकल्पच मृतसाठ्यात गेल्याने चिंता वाढल्या आहेत.प्रकल्पात केवळ ९८ दलघमी पाणी४सद्यस्थितीत प्रकल्पात केवळ ९८ दलघमी पाणी साठा आहे. जो की मृत पाणी साठा आहे. तसेच दुधनेच्या बॅक वॉटरमधून ऊस व उन्हाळी पिकांसाठी दिवस रात्र कृषीपंपाद्वारे बेसुमार पाणी उपसा केला जात आहे. याचा मोठा फटका पाणीसाठ्यावर झाला. त्यामुळे शहरांना पाणी पुरवठा करताना सेलू पालिकेची यावेळी कसरत होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीwater scarcityपाणी टंचाई