शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सहा वर्षानंतर दुधना प्रकल्प मृत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:27 IST

अनेक शहरांसह दुधना नदी काठावरील शेकडो गावांची तहान भागविणारा निम्न दुधना प्रकल्प सहा वर्षांनंतर मृतसाठ्यात गेला आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढणार असून उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): अनेक शहरांसह दुधना नदी काठावरील शेकडो गावांची तहान भागविणारा निम्न दुधना प्रकल्प सहा वर्षांनंतर मृतसाठ्यात गेला आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढणार असून उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.दुधना प्रकल्पातून सेलू शहर तसेच जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा या शहारासह आठ गाव पाणी पुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच परभणी, पूर्णा या शहरांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. गतवर्षी दुधना प्रकल्पातून तीन वेळा नदीपात्राद्वारे पूर्णा शहरापर्यंत पाणी देण्यात आले. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा होऊ शकला नाही. त्यातच रबी हंगामातील पिकांसाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून दोन वेळा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. तसेच दुधनेच्या बॅक वॉटरमधून पिकांना पाणी देण्यासाठी बेसुमार पाणी उपसा अनेक दिवस सुरू होता. परिणामी प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा वेगाने कमी होत राहिला. दुधना प्रकल्पात २०१० मध्ये पाणी अडविण्यास सुरूवात झाली. त्यावेळी दोन्ही कालव्याची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे; परंतु, डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंचनासाठी पाणी देण्यात आले. उजव्या कालव्याचे अद्यापही काम अपूर्ण असले तरी ज्या ठिकाणापर्यंत काम पूर्ण आहे, त्या ठिकाणापर्यत पाणी सोडले जाते. अल्प पाऊस व पाण्याचा झालेला बेसुमार उपसा यामुळे २०१३ नंतर तब्बल सहा वर्षानंतर दुधना प्रकल्प मृत साठ्यात गेला आहे. परिणामी मंठा, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा या शहरांना प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दरम्यान, दुधनेतील पाणीसाठ्यावर शेतकरी अवलंबून असतात. टंचाईकाळात जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी दुधनेतून उपलब्ध केले जाते; परंतु, प्रकल्पच मृतसाठ्यात गेल्याने चिंता वाढल्या आहेत.प्रकल्पात केवळ ९८ दलघमी पाणी४सद्यस्थितीत प्रकल्पात केवळ ९८ दलघमी पाणी साठा आहे. जो की मृत पाणी साठा आहे. तसेच दुधनेच्या बॅक वॉटरमधून ऊस व उन्हाळी पिकांसाठी दिवस रात्र कृषीपंपाद्वारे बेसुमार पाणी उपसा केला जात आहे. याचा मोठा फटका पाणीसाठ्यावर झाला. त्यामुळे शहरांना पाणी पुरवठा करताना सेलू पालिकेची यावेळी कसरत होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीwater scarcityपाणी टंचाई