शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

परभणी : सहा वर्षानंतर दुधना प्रकल्प मृत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:27 IST

अनेक शहरांसह दुधना नदी काठावरील शेकडो गावांची तहान भागविणारा निम्न दुधना प्रकल्प सहा वर्षांनंतर मृतसाठ्यात गेला आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढणार असून उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): अनेक शहरांसह दुधना नदी काठावरील शेकडो गावांची तहान भागविणारा निम्न दुधना प्रकल्प सहा वर्षांनंतर मृतसाठ्यात गेला आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढणार असून उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.दुधना प्रकल्पातून सेलू शहर तसेच जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा या शहारासह आठ गाव पाणी पुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच परभणी, पूर्णा या शहरांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. गतवर्षी दुधना प्रकल्पातून तीन वेळा नदीपात्राद्वारे पूर्णा शहरापर्यंत पाणी देण्यात आले. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा होऊ शकला नाही. त्यातच रबी हंगामातील पिकांसाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून दोन वेळा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. तसेच दुधनेच्या बॅक वॉटरमधून पिकांना पाणी देण्यासाठी बेसुमार पाणी उपसा अनेक दिवस सुरू होता. परिणामी प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा वेगाने कमी होत राहिला. दुधना प्रकल्पात २०१० मध्ये पाणी अडविण्यास सुरूवात झाली. त्यावेळी दोन्ही कालव्याची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे; परंतु, डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंचनासाठी पाणी देण्यात आले. उजव्या कालव्याचे अद्यापही काम अपूर्ण असले तरी ज्या ठिकाणापर्यंत काम पूर्ण आहे, त्या ठिकाणापर्यत पाणी सोडले जाते. अल्प पाऊस व पाण्याचा झालेला बेसुमार उपसा यामुळे २०१३ नंतर तब्बल सहा वर्षानंतर दुधना प्रकल्प मृत साठ्यात गेला आहे. परिणामी मंठा, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा या शहरांना प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दरम्यान, दुधनेतील पाणीसाठ्यावर शेतकरी अवलंबून असतात. टंचाईकाळात जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी दुधनेतून उपलब्ध केले जाते; परंतु, प्रकल्पच मृतसाठ्यात गेल्याने चिंता वाढल्या आहेत.प्रकल्पात केवळ ९८ दलघमी पाणी४सद्यस्थितीत प्रकल्पात केवळ ९८ दलघमी पाणी साठा आहे. जो की मृत पाणी साठा आहे. तसेच दुधनेच्या बॅक वॉटरमधून ऊस व उन्हाळी पिकांसाठी दिवस रात्र कृषीपंपाद्वारे बेसुमार पाणी उपसा केला जात आहे. याचा मोठा फटका पाणीसाठ्यावर झाला. त्यामुळे शहरांना पाणी पुरवठा करताना सेलू पालिकेची यावेळी कसरत होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीwater scarcityपाणी टंचाई