शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

परभणी : येलदरी धरणातील गाळ काढण्यास प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क येलदरी ( परभणी ) : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातील पाणीसाठा मृतसाठ्यात गेला असतानाही यावर्षी या प्रकल्पातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातील पाणीसाठा मृतसाठ्यात गेला असतानाही यावर्षी या प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नाही़ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे धरणाची साठवण क्षमता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़येलदरी प्रकल्पात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा कमी झाला आहे़ राज्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याची साठवण क्षमता वाढावी, या उद्देशाने प्रकल्पातील गाळ काढून तो शेतात टाकण्यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हे अभियानही राबविले होते़ गतवर्षी याच अभियानांतर्गत येलदरी प्रकल्पातील ४ लाख २० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला होता़ अंबाजोगाई येथील मानवलोक, मारिको इनोव्हेशन संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली़ या तलावातील गाळ काढून स्थानिक शेतकऱ्यांना तो मोफत दिला होता़ गाळ उपसण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री संस्थेमार्फत देण्यात आली होती़ त्यामुळे उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा ज्या ठिकाणी कमी झाला आहे़ तेथील गाळ उपसल्याने या प्रकल्पातील पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली होती़यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच येलदरी प्रकल्पातील पाणी मृतसाठ्यात गेले आहे़ त्यामुळे हा प्रकल्प जागोजागी उघडा पडला आहे़ मृतसाठ्यामध्ये किमान ४० टक्के गाळ असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ परंतु, प्रशासकीय उदासिनतेमुळे यावर्षी गाळ काढण्याच्या कामाकडे पाठ फिरविण्यात आली़ परिणामी चांगली संधी उपलब्ध होवूनही येलदरी प्रकल्पातील गाठ उपसा होवू शकला नाही़ येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असून, धरणातील गाळ उपसला नसल्याने पाणीसाठ्यात घट होण्याची शक्यता आहे़ या प्रकल्पातील गाळाचा उपसा केला असता तर प्रकल्पाची साठवण क्षमता वाढली असती, शिवाय शेतकऱ्यांना या गाळाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठीही फायदा झाला असता़ मात्र सरकारी पातळीवरील अनास्थेमुळे येलदरी प्रकल्प गाळयुक्तच राहणार आहे़सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज४परभणी जिल्ह्यात दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ तीन जिल्ह्यांची तहान भागविणारा येलदरी प्रकल्प यावर्षी मृतसाठ्यात गेला असून, प्रकल्पाचा बराचसा भाग उघडा पडला आहे़४मृतसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असून, हा गाळ काढण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ प्रकल्पातील गाळाचा उपसा झाला तर या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता वाढेल़४पर्यायाने जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल़ येलदरी प्रमाणेच जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ तेव्हा पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे़येलदरी धरणातील गाळ काढण्यासाठी यावर्षी प्रशासकीय पातळीवर कोणतेही नियोजन नाही़ त्यामुळे अद्याप गाळ काढण्याचे काम सुरू केले नाही़-सुरेश शेजूळ, तहसीलदार, जिंतूरगतवर्षी एनजीओ व मानवलोकच्या माध्यमातून येलदरी धरणातील गाळ काढला होता़ मात्र यावर्षी तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही़ त्यामुळे गाळ काढण्याचे काम सुरू केले नाही़-एसक़े़ सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, नांदेड

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण