शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

परभणी : कालव्यातील ९० टक्के पाण्याची होतेय नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:58 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दिवसानंतर केवळ १० कि.मी. पर्यंतच पाणी पोहचले असून, शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दिवसानंतर केवळ १० कि.मी. पर्यंतच पाणी पोहचले असून, शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बोरीसह परिसरातील शेतकºयांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी काही वर्षापूूर्वी जिंतूर तालुक्यातील निवळी येथे करपरा धरण उभारण्यात आले. या धरणातील पाण्यावर २४ कि.मी. अंतरावरील शेतकºयांना सिंचनाची सुविधा होऊ शकते. त्यामुळे बोरी, निवळी व परिसरातील शेतकºयांना हे धरण एक वरदान ठरले.यावर्षी जूनपासूनच समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, मूग व उडीद ही पिके शेतकºयांच्या हातून गेली. लागवडीवर केलेला खर्चही शेतकºयांच्या पदरात पडला नाही. त्यामुळे रबी हंगामातील पिके घेण्यासाठी करपरा धरणात मूबलक पाणीसाठा असल्याचे शेतकºयांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांनी रबी हंगामातील पेरणीची लगबग सुरू केली. शेतकरी, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. या कालव्यावर चार ठिकाणी पूलही उभारण्यात आले आहेत. पाणी सोडण्याआधी पाटबंधारे विभागाकडून या पुलांची व कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते; परंतु, तसे केले नाही.पंधरा दिवसांपासून सोडण्यात आलेले पाणी केवळ दहा कि.मी. अंतरापर्यंतच पोहचले आहे. त्यामुळे अजूनही १४ कि.मी. अंतरावरील शेतकºयांना पाणीच मिळाले नाही. विशेष म्हणजे, पाटबंधारे विभागाकडून या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी तब्बल ९० टक्के पाणी वाया जात आहे. त्यामुळे रबी हंगामातील पेरणीसाठी करपरा धरणातील पाणी मिळेल, या आशेवर बसलेल्या शेतकºयांच्या पदरी सध्या तरी निराशा आली आहे.पाटबंधारे विभागातील अधिकाºयांनी सोडण्यात आलेले पाणी तत्काळ बंद करून कालव्याची व कालव्यावरील पुलांची दुरुस्ती करून पुन्हा पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.तक्रारी करूनही : होईना उपयोग४जिंतूर तालुक्यातील निवळी येथे करपरा धरण आहे; परंतु, या धरणाचे कार्यालय बोरी येथे आहे. या कार्यालयाकडे कालव्याच्या दुरुस्ती संदर्भात वेळोवेळी तक्रारी करूनही अद्यापपर्यंत कोणताच उपयोग झाला नाही. विशेष म्हणजे, हे कार्यालय नेहमीच बंद असते. शाखा अभियंता नेहमीच गैरहजर राहत असल्याने कार्यालयातील कर्मचाºयांवर अंकूश राहिलेला नाही.४त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन कालव्याची व पुलाची दुरुस्ती न करताच पाणी सोडणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कार्यवाही करावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांमधून केली जात आहे.दरम्यान, शाखा अभियंता दत्तराव पतंगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कालव्यावरील पाण्याची चार ठिकाणाहून नासाडी होत असल्याचे सांगितले. तेव्हा पतंगे यांनी पाण्याचा झिरपा नेहमीच सुरू राहतो, यासाठी कोणत्याही उपाययोजना करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी