शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

परभणी : ७४ कोटी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:54 PM

गंभीर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने दुसºया टप्प्यांतर्गत दिलेला ७३ कोटी ९२ लाख १० हजार रुपयांचा निधी प्रत्येक तालुक्यांना तहसीलदारांच्या खात्यावर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी वितरित केला आहे़ या संदर्भातील आदेश २२ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंभीर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने दुसºया टप्प्यांतर्गत दिलेला ७३ कोटी ९२ लाख १० हजार रुपयांचा निधी प्रत्येक तालुक्यांना तहसीलदारांच्या खात्यावर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी वितरित केला आहे़ या संदर्भातील आदेश २२ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले़गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील ६९२ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे़ त्यामध्ये परभणी, पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ, सेलू या तालुक्यातील सर्वच तर जिंतूर तालुक्यातील १६९ पैकी १०९, गंगाखेड तालुक्यातील १०६ पैकी ८६ आणि पूर्णा तालुक्यातील ९५ पैकी १८ गावांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार ५२७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे़या बाधित शेतकºयांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता़ त्या अनुषंगाने शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना २ हप्त्यात मदतीची रक्कम देण्यात येत आहे़ त्यामध्ये प्रथम हप्ता ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर प्रमाणे ५० टक्के म्हणजेच ३ हजार ४०० रुपये प्रती हेक्टर किंवा १ हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम शेतकºयांना देण्यात येणार आहे़ तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी १८ हजार प्रति हेक्टर या अनुज्ञेय दराच्या ५० टक्के म्हणजेच ९ हजार रुपये प्रति हेक्टर किंवा २ हजार अधिक असेल ती रक्कम बाधित शेतकºयांच्या देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्या अनुषंगाने यापूर्वी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी १०७ कोटी ५४ लाख ४५ हजार ७६० रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे़ यामध्ये परभणी तालुक्याला ३२ कोटी ७० हजार, पालमला १३ कोटी ३६ लाख २४ हजार तर पाथरीला १४ कोटी ४७ लाख १८ हजार, मानवतला १४ कोटी ७० लाख ४८ हजार, सोनपेठ तालुक्याला १२ कोटी ५ लाख ७० हजार व सेलू तालुक्याला २० कोटी ९४ लाख १५ हजार ७६० रुपये असा निधी वितरित करण्यात आला होता़ आता पुन्हा जिल्ह्याला दुसºया टप्प्यात शेतकºयांसाठी निधी उपलब्ध झाला आहे़त्यानुसार जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी २२ फेब्रुवारी रोजी या संदर्भातील आदेश काढून या सहा तालुक्यांना ७३ कोटी ९२ लाख १० हजार रुपयांच निधी वितरित केला आहे़ त्यामध्ये परभणी तालुक्याला २२ कोटी, पालम तालुक्याला ९ कोटी १८ लाख ४८ हजार, पाथरी तालुक्याला ९ कोटी ९४ लाख ७२ हजार, मानवत तालुक्याला १० कोटी १० लाख ७२ हजार, सोनपेठ तालुक्याला ८ कोटी २८ लाख ७५ हजार आणि सेलू तालुक्याला १४ कोटी ३९ लाख ७३ हजार रुपये देण्यात आले आहेत़दोन्ही टप्प्यांत मिळून आतापर्यंत या सहा तालुक्यांना १८१ कोटी ४६ लाख ५५ हजार ७६० रुपये वितरित करण्यात आले आहेत़ हा निधी तहसीलदारांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला आहे़ यापूर्वी देण्यात आलेल्या पहिल्या हप्त्याचे पूर्ण वाटप शेतकºयांच्या खात्यावर झाल्यानंतर शिल्लक रक्कमेतून बाधीत शेतकºयांना दुसºया हप्त्याची रक्कम वितरित करण्यात यावी, असे या संदर्भातील आदेशात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी म्हटले आहे़चार दिवसांतच निधी वर्ग करावा लागणार४सहाही तालुक्यांतील तहसीलदारांना या निधीचे २२ फेब्रुवारी रोजी वितरण करण्यात आले असले तरी त्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व निधी संबंधित पात्र शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करावा लागणार आहे़ तशी कडक सूचना जिल्हाधिकाºयांनी सर्व तहसीलदारांना दिली आहे़ अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध निधी आवश्यकरितीने कोषागारातून आर्हरित करून तो वाटपासाठी बँकेकडून राहणार नाही, याची काटेकोर दक्षता संबंधित अधिकाºयांनी घ्यावी, यात दिरंगाई आढळून आल्यास तात्पुरता अपहार समजून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला आहे़ वितरित अनुदानातून काही रक्कम शिल्लक राहत असेल तर ती विहित वेळेत प्रत्यार्पित करावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे़तहसीलदारांना घ्यावा लागणार आढावातहसील कार्यालयाकडून शेतकºयांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यासाठी तो बँकांना दिला जातो; परंतु, अनेक वेळा तांत्रिक कारणास्तव लाभार्थ्यांचे नाव क्रमांक जुळत नसल्याने आलेला निधी बँका निलंबन खात्यात ठेवतात़ त्यामुळे सदरील रक्कम बँकेकडे पडून राहत़े याला आळा घालण्यासाठी सर्व तहसीलदारांनी दर आठवड्याला यापूर्वी वर्ग करण्यात आलेला निधी व यानंतर वर्ग करण्यात येणारा निधी याचा ताळमेळ घालण्याची कार्यवाही करावी, असेही याबाबतच्या आदेशात जिल्हाधिकाºयांनी नमूद केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीTahasildarतहसीलदारcollectorजिल्हाधिकारी