शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६५ गावांच्या सिंचन प्रश्नी लक्ष घालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:44 IST

चार तालुक्यांतील माथ्यावरील ६५ गावांच्या सिंचन प्रश्नाकडे लक्ष घालण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चार तालुक्यांतील माथ्यावरील ६५ गावांच्या सिंचन प्रश्नाकडे लक्ष घालण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले.राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाºया विविध योजना गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहचल्यात की नाहीत, या संदर्भातील माहिती घेण्यासाठी तसेच सुधारणा आणि अडचणींसंदर्भात शेतकºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचा ‘लोकसंवाद’ हा कार्यक्रम सोमवारी सकाळी ११़४० च्या सुमारास आयोजित करण्यात आला होता़ त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षामध्ये जिल्ह्यातील १५ शेतकºयांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला़ यावेळी पेडगाव येथील शेतकरी मंगेश प्रताप देशमुख यांनी बोलताना आपल्याकडे साडेचार एकर शेती असून, त्यापैकी अडीच एकरमध्ये फळबाग फुलविली आहे़ पावणे दोन एकरात फूल शेती करीत आहे़ यासाठी कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ झाल्याचे सांगितले़ गावाच्या दोन्ही बाजूंनी लोअर दुधना आणि जायकवाडी धरणाचे कालवे आहेत़ मात्र दोन्ही कालव्यांच्यामध्ये असलेल्या ६५ गावांच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे़ या प्रश्नी आपण पुढाकार घेऊन तो सोडवावा, असे साकडे देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना घातले़ त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासन सिंचनाच्या सुविधा शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजना यशस्वीरीत्या राबवित आहे़ शेतकºयांना त्याचा फायदाही होत आहे़ ६५ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच राज्य सरकार लक्ष घालेल, असे सांगितले़ त्यामुळे भविष्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली लागण्याच्या दृष्टीकोनातून हालचाली होण्याच्या अपेक्षा परभणी, मानवत, सेलू व जिंतूर तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थांना लागल्या आहेत़यावेळी गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील शेतकरी शेषराव सोपानराव निरस यांनी २०१७ मध्ये खरीप हंगामात झालेल्या नुकसानीतील २० हजार रुपये हेक्टर प्रमाणे ४० हजार रुपये मिळाल्याचे सांगितले़ या पैशाचा रबीच्या निविष्टा खरेदीसाठी फायदा झाल्याचे ते म्हणाले़ पीक विमा योजनेत क्षेत्र सुधार गुणांक व जोखीम स्तराच्या सुधारणेबद्दलही यावेळी त्यांनी सूचना केल्या़ जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील शेतकरी शिवाजी सानप यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामाने पाणी पातळीत वाढ झाल्याचे सांगितले़ आता गावात सध्या १२ एकरवर द्राक्षाची लागवड करण्यात आली असल्याचे सांगून त्यांनी शेतकरी शेततळे घेऊ इच्छितात़ मात्र अनुदान अपुरे पडते आणि पन्नीसाठी अनुदान मिळत नसल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली़ शेवडी येथील शेतकरी खुशाल काळे यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा लाभ मिळाल्यामुळे ६ एकरात द्राक्ष बाग फुलविल्याचे सांगितले़ शेतात घेतलेल्या शेततळ्याचा फायदाही त्यांनी यावेळी सांगितला़ यावर मुख्यमंत्र्यांनी शेततळ्याच्या सबसिडीसाठी कोणाला पैसे दिले का, असा प्रतिप्रश्न करताच काळे यांनी कोणालाही पैसे दिले नसल्याचे सांगितले़ दैठणा येथील शेतकरी भरत कच्छवे यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेतून सव्वा लाख रुपये अनुदानातून ट्रॅक्टर मिळाल्याचे सांगितले़ थेट रक्कम मिळत असल्याने शेतकरी मनाप्रमाणे ट्रॅक्टर किंवा कृषी आवजारे घेऊ शकत आहेत़ याचा शेतकºयांना फायदा झाल्याचे ते म्हणाले़ इंद्रायणी काठावर बंधारे बांधल्यास या भागातील पाण्याचा प्रश्न सुटेल असे ते म्हणाले़ धानोरा काळे येथील शेतकरी प्रताप काळे यांनी वगार पालनासाठी बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचण येत असल्याचे सांगितले़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालण्यात येईल, असे सांगितले़ खानापूर येथील शेतकरी पंडित थोरात यांनी संत शिरोमणी सावता माळी शेतकरी बाजारामुळे पहिल्याच दिवशी कृषी मालाला चांगला भाव मिळाल्याचे सांगितले़ शेतकरी बाजारात आपण दोन-तीन प्रकारचे वांगे विक्रीसाठी आणले होते़ या वांग्याला १० रुपयांऐवजी प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळाल्याचे ते म्हणाले़ यावेळी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, शेतकरी बालाजी मोहिते आदींची उपस्थिती होती़शासन एक लाख सौरपंप देणार४यावेळी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील शेतकरी मोहन सिताराम कापसे यांनी २० शेतकºयांचा गट स्थापन करून आम्ही पॉली हाऊस सुरू केले असल्याचे सांगितले़ यासाठी कृषी विभागाने अनुदान दिले असून, डच फुलाचे उत्पादन या गटामार्फत मोठ्या प्रमाणात घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले़ भारनियमाच्या समस्येमुळे आम्ही शेतकरी त्रस्त असल्याचे ते म्हणाले़ यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात १ लाख सौरपंप देण्याची योजना राबविणार असून, सर्व फिडर हे सौर उर्जेवर चालविण्यात येणार आहेत़ हे काम सुरु झाले आहे़ काही वर्षांत ते पूर्ण होईल, तेव्हा २४ तास वीज उपलब्ध होईल, असे ते म्हणाले़सिमला मिरचीतून मिळाले उत्पादनया लोकसंवाद कार्यक्रमात पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील महिला शेतकरी जयमाला अशोकराव शिंदे याही उपस्थित होत्या़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना तार्इंना बोलू द्या, असे सांगितल्यानंतर शिंदे यांनी आपण आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्याचे सांगून १६ लाख रुपये किंमतीचे शेतात पॉलीहाऊस घेतल्याचे त्या म्हणाल्या़ सिमला मिरचीच्या उत्पादनातून यावर्षी चांगले वार्षिक उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री