शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

परभणी : ६४ हजार पुस्तके दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:24 IST

तालुक्यातील १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांसाठी ६४ हजार पाठ्यपुस्तके दाखल झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी या पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यातील १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांसाठी ६४ हजार पाठ्यपुस्तके दाखल झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी या पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्यात येणार आहेत. मानवत तालुक्यात मराठी माध्यमातील १२ हजार ४९५ तर उर्दू माध्यमाचे १ हजार १७८ असे एकूण १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांची संख्या आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके मिळावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने औरंगाबाद येथील बालभारती पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पुुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मानवत तालुक्यासाठी ६४ हजार ११३ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २३ मे रोजी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या सभागृहात ही पुस्तके उतरविण्यात आली आहेत. केंद्रप्रमुखांच्या मागणीनुसार पंधरवाडयात मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यावर्र्षी आत्ताच पुस्तके उपलब्ध झाल्याने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करणे सोपे जाणार असल्याची माहिती विभागप्रमुख गुंजे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक