शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:38 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कमेचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याला १०७ पैकी ५३ कोटी ७७ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कमेचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याला १०७ पैकी ५३ कोटी ७७ लाखांचा निधी देण्यात आला आहे.खरीप २०१८ या हंगामात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ८४९ पैकी ७७२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. जिल्ह्यातील प्रत्यक्ष पेरणी झालेल्या ४ लाख ६८ हजार ८१ हेक्टर जमिनीपैकी ४ लाख ६७ हजार ५२७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. परभणी सारखीच स्थिती राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होती.त्या अनुषंगाने राज्याच्या महसूल व वन विभागाने २५ जानेवारी रोजी आदेश काढला आहे. त्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील १५१ तालुक्यांतील शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकºयांना निविष्ठा अनुदान म्हणून दोन टप्प्यात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत राज्यासाठी २ हजार ९०९ कोटी ५१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या रक्कमेतून शेती पिकाचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकºयांना प्रथम हप्ता म्हणून ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या दराच्या ५० टक्के म्हणजे ३ हजार ४०० रुपये प्रति हेक्टर किंवा किमान १ हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच बहुवार्षिक फळ पिकांसाठीही प्रति हेक्टरी १८ हजार रुपये प्रति हेक्टर दराच्या ५० टक्के म्हणजेच ९ हजार रुपये किंवा किमान २ हजार रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती मदत म्हणून देण्यात येणार आहे. ही मदत २ हेक्टर मर्यादेपर्यंतच राहणार आहे. सदरील मदतीचे वाटप २०१८ मधील खरीप हंगामामधील सातबारावरील पिकाच्या नोंदीच्या आधारे करण्यात येणार आहे.जिल्ह्यासाठी १०७ कोटी ५४ लाखजिल्ह्यातील शेतकºयांच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी २५७ कोटी २६ लाख रुपयांची तर फळ पिकांच्या नुकसानीपोटी ५ कोटी ३० लाख असे एकूण २६२ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीनी मागणी होती; परंतु, राज्य शासनाने घोषित केल्या प्रमाणे जिल्ह्यातील शेतकºयांना ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे एकूण १०७ कोटी ५४ लाख ४५ हजार ५७६ रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी प्रथम हप्प्त्यात ५३ कोटी ७ लाख ७२ हजार २८८ रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पहिल्या हप्ता वाटपानंतर राहिलेली ५० टक्के रक्कम शेतकºयांना नंतरच्या कालावधीत देण्यात येणार आहे. हा कालावधी मात्र कधी? ते सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे तुर्त ५० टक्के रक्कमेवरच शेतकºयांना समाधान मानावे लागणार आहे.मदतीतून थकबाकी वसूल करु नये४मदतीची रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम खातेदारांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर कोणत्याही बँकेने त्यामधून कसल्याही प्रकारची वसुली करु नये, असे स्पष्ट निर्देश महसूल व वन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढलेल्या आदेशात दिले आहेत. फळ पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासोबत ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) चे फोटो आवश्यक करण्यात आले आहेत. त्याच आधारे दाव्याची ग्राह्यता पडताळता येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी