शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:38 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कमेचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याला १०७ पैकी ५३ कोटी ७७ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कमेचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याला १०७ पैकी ५३ कोटी ७७ लाखांचा निधी देण्यात आला आहे.खरीप २०१८ या हंगामात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ८४९ पैकी ७७२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. जिल्ह्यातील प्रत्यक्ष पेरणी झालेल्या ४ लाख ६८ हजार ८१ हेक्टर जमिनीपैकी ४ लाख ६७ हजार ५२७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. परभणी सारखीच स्थिती राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होती.त्या अनुषंगाने राज्याच्या महसूल व वन विभागाने २५ जानेवारी रोजी आदेश काढला आहे. त्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील १५१ तालुक्यांतील शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकºयांना निविष्ठा अनुदान म्हणून दोन टप्प्यात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत राज्यासाठी २ हजार ९०९ कोटी ५१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या रक्कमेतून शेती पिकाचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकºयांना प्रथम हप्ता म्हणून ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या दराच्या ५० टक्के म्हणजे ३ हजार ४०० रुपये प्रति हेक्टर किंवा किमान १ हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच बहुवार्षिक फळ पिकांसाठीही प्रति हेक्टरी १८ हजार रुपये प्रति हेक्टर दराच्या ५० टक्के म्हणजेच ९ हजार रुपये किंवा किमान २ हजार रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती मदत म्हणून देण्यात येणार आहे. ही मदत २ हेक्टर मर्यादेपर्यंतच राहणार आहे. सदरील मदतीचे वाटप २०१८ मधील खरीप हंगामामधील सातबारावरील पिकाच्या नोंदीच्या आधारे करण्यात येणार आहे.जिल्ह्यासाठी १०७ कोटी ५४ लाखजिल्ह्यातील शेतकºयांच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी २५७ कोटी २६ लाख रुपयांची तर फळ पिकांच्या नुकसानीपोटी ५ कोटी ३० लाख असे एकूण २६२ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीनी मागणी होती; परंतु, राज्य शासनाने घोषित केल्या प्रमाणे जिल्ह्यातील शेतकºयांना ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे एकूण १०७ कोटी ५४ लाख ४५ हजार ५७६ रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी प्रथम हप्प्त्यात ५३ कोटी ७ लाख ७२ हजार २८८ रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पहिल्या हप्ता वाटपानंतर राहिलेली ५० टक्के रक्कम शेतकºयांना नंतरच्या कालावधीत देण्यात येणार आहे. हा कालावधी मात्र कधी? ते सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे तुर्त ५० टक्के रक्कमेवरच शेतकºयांना समाधान मानावे लागणार आहे.मदतीतून थकबाकी वसूल करु नये४मदतीची रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम खातेदारांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर कोणत्याही बँकेने त्यामधून कसल्याही प्रकारची वसुली करु नये, असे स्पष्ट निर्देश महसूल व वन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढलेल्या आदेशात दिले आहेत. फळ पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासोबत ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) चे फोटो आवश्यक करण्यात आले आहेत. त्याच आधारे दाव्याची ग्राह्यता पडताळता येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी