शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:54 IST

५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल्याने भयान दुष्काळाची चाहूल लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): ५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल्याने भयान दुष्काळाची चाहूल लागली आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे १९६८ साली पहिल्यांदा ९३४ दलघमी पाणीसाठा आडवण्यात आला होता. मागील पन्नास वर्षाच्या इतिहासात १९७२ चा अपवाद वगळता शेतकºयांना सिंचनासाठी उपयोगी ठरलेले हे धरण आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे या धरणात पाणी साठवण होत नाही. यावर्षी तर परिस्थिती खूपच बिकट आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने या धरणावर अवलंबून असलेले ५८ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र यावर्षी कमी राहणार आहे. त्याच बरोबर सहा मोठे शहर, २२५ हून अधिक गावे, वाड्या व तांडे यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यात पाण्याचे नियोजन करताना येलदरी धरणात उपलब्ध असलेल्या ९ टक्के पाण्याचे नियोजन करता करता जलसंपदा विभागाच्या नाकीनऊ येणार आहेत, हे निश्चित. येलदरी धरणात उपलब्ध असलेले सर्व पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी शेती सिंचनासाठी मिळणार नसल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे अपुºया पावसामुळे ५० वर्षात पहिल्यांदाच या धरणातून शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन होणार नाही. त्यामुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत जमीन सिंचनाविना कोरडी राहणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प