शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:54 IST

५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल्याने भयान दुष्काळाची चाहूल लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): ५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल्याने भयान दुष्काळाची चाहूल लागली आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे १९६८ साली पहिल्यांदा ९३४ दलघमी पाणीसाठा आडवण्यात आला होता. मागील पन्नास वर्षाच्या इतिहासात १९७२ चा अपवाद वगळता शेतकºयांना सिंचनासाठी उपयोगी ठरलेले हे धरण आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे या धरणात पाणी साठवण होत नाही. यावर्षी तर परिस्थिती खूपच बिकट आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने या धरणावर अवलंबून असलेले ५८ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र यावर्षी कमी राहणार आहे. त्याच बरोबर सहा मोठे शहर, २२५ हून अधिक गावे, वाड्या व तांडे यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यात पाण्याचे नियोजन करताना येलदरी धरणात उपलब्ध असलेल्या ९ टक्के पाण्याचे नियोजन करता करता जलसंपदा विभागाच्या नाकीनऊ येणार आहेत, हे निश्चित. येलदरी धरणात उपलब्ध असलेले सर्व पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी शेती सिंचनासाठी मिळणार नसल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे अपुºया पावसामुळे ५० वर्षात पहिल्यांदाच या धरणातून शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन होणार नाही. त्यामुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत जमीन सिंचनाविना कोरडी राहणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प