शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

परभणी : ७२४ शेतकऱ्यांचे ५.४० कोटी माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:42 IST

महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील पिंगळी व सेलू तालुक्यातील गिरगाव येथील ७२४ शेतकऱ्यांचे ५ कोटी ४० लाख २२ हजार ८८० रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील पिंगळी व सेलू तालुक्यातील गिरगाव येथील ७२४ शेतकऱ्यांचे ५ कोटी ४० लाख २२ हजार ८८० रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले असून या संदर्भातील घोषणा सोमवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केली. यातील २८ शेतकºयांचा प्रशासनाने सत्कार करण्यात आला. त्यातील दोन शेतकºयांशी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी व्हिडिओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून संवाद साधला.राज्य शासनाने घोषित केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्ज माफी योजनेच्या प्रत्यक्ष लाभास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. या अनुषंगाने या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर परभणी तालुक्यातील पिंगळी आणि सेलू तालुक्यातील गिरगाव या गावांची पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड केली होती. त्या अनुषंगाने या गावांमधील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आल्या. त्यामध्ये पिंगळी येथील ६२८ व गिरगाव येथील ९६ अशा ७२४ शेतकºयांची यादी परिपूर्ण प्रस्तावांसह जिल्हाधिकाºयांकडे सकाळीच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आली. त्यानुसार या पिंगळी येथील शेतकºयांचे ४ कोटी ५९ लाख ६१ हजार ५०३ तर गिरगाव येथील शेतकºयांचे ८० लाख ६१ हजार ३७७ रुपये असे एकूण ५ कोटी ४० लाख २२ हजार ८८० रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा सकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केली.कर्जमाफी झालेल्या शेतकºयांमधील पिंगळीतील २६ व गिरगावमधील २ शेतकºयांना प्रशसनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले होते. या शेतकºयांचा प्रशासनाकडून सत्कार करुन त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्या स्रेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यातील पिंगळी येथील शेतकरी विठ्ठल गरुड यांचे १ लाख १५ हजार ८७५ रुपयांचे आणि गिरगाव येथील शेतकरी बाबाराव दामोधर यांचे १ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. या दोन्ही शेतकºयांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दुपारी १ वाजता व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी शेतकरी विठ्ठल गरुड यांनी, या कर्जमाफीमुळे आपल्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी झाल्याचे सांगितले.त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना त्यांच्या मुलीच्या ५ मार्च रोजी असलेल्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन त्यांचे कर्जमाफीबद्दल आभार मानले. बाबाराव दमोधर यांनी या कर्जमाफीबाबत समाधान व्यक्त केले.१३२१ केंद्रावर: प्रमाणिकीकरणाची सुविधा४जिल्हा प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर शेतकºयांची यादी यापुर्वी जाहीर केली असून या शेतकºयांना प्रमाणिकीकरण करणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील १३२१ सीएससी केंद्रावर खात्यांचे आधार प्रामाणिकीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.जिल्ह्यात १२७८ कोटींची कर्जमाफी४परभणी जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ८२३ खातेदारांकडील सुमारे १२७८ कोटी ६२ लाख ६३ हजार ६०१ रुपयांची कर्जमाफी होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.४या खात्यापैकी १ लाख ९४ हजार ९३५ पात्र शेतकºयांची खाती अपलोड करण्यात आली असून २८ फेब्रुवारी रोजी या योजनेंतर्गत पहिली अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.८ हजार ९०० शेतकºयांचे खाते आधारविना४कर्जमुक्ती योजनेंतर्गंत आधारशी संलग्न असलेल्या खात्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ८२३ खातेदारांपैकी २ लाख १३ हजार ८४६ खाते आधारशी जुळलेले आहेत. ८ हजार ९७७ शेतकºयांची खाते आधार लिंक नसल्याने या शेतकºयांकडून आधार क्रमांक मिळविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने गावागावात स्थापन केलेल्या शेतकरी मदत केंद्राच्या मदत केंद्रातून केले जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारFarmerशेतकरी