शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

परभणी: ४५ विद्युत व्यवस्थापक निवडीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:06 IST

ग्रामीण भागातील ग्राहकांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी गतवर्षी वीज वितरण कंपनीने मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन वर्र्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही एकाही गावात विद्युत व्यवस्थापंकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया लाल फितीत अडकल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : ग्रामीण भागातील ग्राहकांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी गतवर्षी वीज वितरण कंपनीने मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन वर्र्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही एकाही गावात विद्युत व्यवस्थापंकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया लाल फितीत अडकल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने कार्यरत असलेल्या एकाच लाईनमनकडे अनेक गावे असतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी त्या गावात वेळेवर जाता येत नाही. वेळोवेळी ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे. ग्रामीण भागात येणाऱ्या अडी-अडचणी दूर करणे, विजेमुळे होणारे अपघात रोखण्यासह वीजपुरवठा सुरळीत करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० आक्टोबर २०१६ रोजी एक आदेश काढला होता. त्यात ३ हजार लोकसंख्येच्या आतील गावच्या ग्रामपंचायत स्तरावर वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्रामविद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्यात यावे, असे सुचविले होते. या आदेशानुसार ग्रामपंचायतीनी जाहीरात काढून त्याद्वारे आयटीआयचा इलेक्ट्रीकल वायरमन ट्रेड उतीर्ण असलेल्या व ५ कि.मी. अंतराच्या आत राहणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविले होते. ३४ ग्रामपंचायतींनी अर्ज मागिवल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करुन सर्व प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे सादर केले. पंचायत समितीने महावितरणला हे प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र वीज वितरण कंपनीच्या वतीने कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या तातडीने नियुक्ती करण्याबाबत महावितरणने पुढाकार घेणे गरजेचे आहे. दुसरीकडे या प्रक्रियेला दोन वर्षाचा कालावधी उलटूनही विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या असल्याने अर्ज केलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.गावाताच नोकरी मिळणार, या आशेने अर्ज केलेले उमेदवार ग्रामपंचायत कार्यालयाच्या चकरा मारीत आहेत. मात्र जिल्हा परिषद स्तरावर ही निवड प्रक्रिया लाल फितीत अडकली आहे.विद्युत व्यवस्थापकांची कामेग्रामविद्युत व्यवस्थापकामार्फत गावातील मीटर रीडिंग घेणे, वीज देयकांचे वाटप करणे, ब्रेकडाउन अहेड करुन वीज पुरवठा पूर्ववत सुरु करणे, डीओ, फ्युज टाकणे, पथदिवे, नवीन जोडणी करणे, थकबाकी वसुल करणे, वीजपुरवठा बंद करणे यासारखी विविध कामे विद्युत व्यवस्थापकाला करारी लागणार आहेत.११ ग्रामपंचायतींना मिळेना उमेदवारतालुक्यातील ३ हजार लोकसंख्येच्या ११ ग्रामपंचायतींनी जाहीरातीद्वारे आयटीआय उतीर्ण उमेदवाराना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. मात्र ५ कि.मी. अंतरामधील आयटीआय उतीर्ण उमेदवार सापडत नसल्याने या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव अद्यापही पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले नाहीत. दरम्यान, महावितरणकडे पाठविण्यात आलेल्या ३४ ग्रामपंचायतीच्या प्रस्तावांकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले आहे. या संदर्भात पंचायत समितीकडून पत्रव्यवहार करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनही निवड प्रक्रियेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.बेरोजगार युवकांचा हिरमोडआयटीआयचे शिक्षण झालेल्या तालुक्यातील बेरोजगार युवकांना हाताला काम मिळेल. या आशेने ३४ युवकानी वेगवेगळ्या ग्रामपंचायतीकडे ग्रामविद्युत व्यवस्थापकपदावर नियुक्ती व्हावी, यासाठी अर्ज केले होते. आपल्याला गावातच रोजगार मिळेल, या आशेने बेरोजगार युवकांचे लक्ष दोन वर्षापासून या प्रक्रियेकडे लागले आहे. मात्र आता निर्णय होत नसल्याने प्रक्रियावर प्रश्न चिन्ह लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण