शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

परभणी: ४५ विद्युत व्यवस्थापक निवडीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:06 IST

ग्रामीण भागातील ग्राहकांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी गतवर्षी वीज वितरण कंपनीने मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन वर्र्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही एकाही गावात विद्युत व्यवस्थापंकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया लाल फितीत अडकल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : ग्रामीण भागातील ग्राहकांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी गतवर्षी वीज वितरण कंपनीने मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन वर्र्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही एकाही गावात विद्युत व्यवस्थापंकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया लाल फितीत अडकल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने कार्यरत असलेल्या एकाच लाईनमनकडे अनेक गावे असतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी त्या गावात वेळेवर जाता येत नाही. वेळोवेळी ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे. ग्रामीण भागात येणाऱ्या अडी-अडचणी दूर करणे, विजेमुळे होणारे अपघात रोखण्यासह वीजपुरवठा सुरळीत करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० आक्टोबर २०१६ रोजी एक आदेश काढला होता. त्यात ३ हजार लोकसंख्येच्या आतील गावच्या ग्रामपंचायत स्तरावर वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्रामविद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्यात यावे, असे सुचविले होते. या आदेशानुसार ग्रामपंचायतीनी जाहीरात काढून त्याद्वारे आयटीआयचा इलेक्ट्रीकल वायरमन ट्रेड उतीर्ण असलेल्या व ५ कि.मी. अंतराच्या आत राहणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविले होते. ३४ ग्रामपंचायतींनी अर्ज मागिवल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करुन सर्व प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे सादर केले. पंचायत समितीने महावितरणला हे प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र वीज वितरण कंपनीच्या वतीने कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या तातडीने नियुक्ती करण्याबाबत महावितरणने पुढाकार घेणे गरजेचे आहे. दुसरीकडे या प्रक्रियेला दोन वर्षाचा कालावधी उलटूनही विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या असल्याने अर्ज केलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.गावाताच नोकरी मिळणार, या आशेने अर्ज केलेले उमेदवार ग्रामपंचायत कार्यालयाच्या चकरा मारीत आहेत. मात्र जिल्हा परिषद स्तरावर ही निवड प्रक्रिया लाल फितीत अडकली आहे.विद्युत व्यवस्थापकांची कामेग्रामविद्युत व्यवस्थापकामार्फत गावातील मीटर रीडिंग घेणे, वीज देयकांचे वाटप करणे, ब्रेकडाउन अहेड करुन वीज पुरवठा पूर्ववत सुरु करणे, डीओ, फ्युज टाकणे, पथदिवे, नवीन जोडणी करणे, थकबाकी वसुल करणे, वीजपुरवठा बंद करणे यासारखी विविध कामे विद्युत व्यवस्थापकाला करारी लागणार आहेत.११ ग्रामपंचायतींना मिळेना उमेदवारतालुक्यातील ३ हजार लोकसंख्येच्या ११ ग्रामपंचायतींनी जाहीरातीद्वारे आयटीआय उतीर्ण उमेदवाराना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. मात्र ५ कि.मी. अंतरामधील आयटीआय उतीर्ण उमेदवार सापडत नसल्याने या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव अद्यापही पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले नाहीत. दरम्यान, महावितरणकडे पाठविण्यात आलेल्या ३४ ग्रामपंचायतीच्या प्रस्तावांकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले आहे. या संदर्भात पंचायत समितीकडून पत्रव्यवहार करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनही निवड प्रक्रियेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.बेरोजगार युवकांचा हिरमोडआयटीआयचे शिक्षण झालेल्या तालुक्यातील बेरोजगार युवकांना हाताला काम मिळेल. या आशेने ३४ युवकानी वेगवेगळ्या ग्रामपंचायतीकडे ग्रामविद्युत व्यवस्थापकपदावर नियुक्ती व्हावी, यासाठी अर्ज केले होते. आपल्याला गावातच रोजगार मिळेल, या आशेने बेरोजगार युवकांचे लक्ष दोन वर्षापासून या प्रक्रियेकडे लागले आहे. मात्र आता निर्णय होत नसल्याने प्रक्रियावर प्रश्न चिन्ह लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण