शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
3
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
5
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
6
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
7
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
8
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
9
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
10
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
11
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?
12
गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण
13
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
14
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
15
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
16
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
17
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
18
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
19
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
20
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात

परभणी:४३६ कि.मी.च्या जलवाहिनीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:29 IST

बहुप्रतिक्षीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परभणी शहरात सुमारे ४३६ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जलशुद्धीकरण केंद्रांपासून ते जलकुंभांपर्यंत जलवाहिनी जोडणे, व्हॉल्व्ह टाकणे ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात शहरवासियांना नव्या योजनेतून पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परभणीकरांची पाणी समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बहुप्रतिक्षीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परभणी शहरात सुमारे ४३६ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जलशुद्धीकरण केंद्रांपासून ते जलकुंभांपर्यंत जलवाहिनी जोडणे, व्हॉल्व्ह टाकणे ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात शहरवासियांना नव्या योजनेतून पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परभणीकरांची पाणी समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.परभणी शहराची पाण्याची समस्या दूर व्हावी, या उद्देशाने २००८ मध्ये युआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. सध्या शहराला पाणीपुरवठा करणारी राहाटी येथील पाणीपुरवठा योजनचा ३० वर्षांपूर्वीची आहे. या काळात शहराची लोकसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे राहाटीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना वेळेत आणि मुबलक पाणीपुरवठा होत नाही. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला पाणी वितरण करताना कसरती कराव्या लागत आहेत. सध्या शहराला १५ दिवसांना एक वेळा म्हणजे एका महिन्यात केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे राहाटीच्या बंधाऱ्यात मुबलक पाणी असतानाही परभणीकरांना मात्र कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरवासियांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दोन वर्षांपासून महापालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती दिली आहे. २००८ पासून रखडलेली ही योजना आता अमृत योजनेत मिळालेल्या १०२ कोटी रुपयांच्या खर्चातून पूर्ण केली जात आहे. या योजनेचे दोन टप्पे करण्यात आले असून, त्यातील पहिला टप्पा येलदरी येथील उद्भव विहीर ते परभणी शहराजवळ उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे हा आहे. तो पूर्ण झाला आहे. दुसºया टप्प्यात शहरातील अंतर्गत जलवाहिनी टाकणे, जलकुंभ उभारणे, रायझींग लाईनपासून ते जलकुंभापर्यंत पाणीपुरवठा करणे, व्हाल्व्ह बसविणे आदी कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, आता दुसºया टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत.शहराच्या विविध भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. अमृत योजनेअंतर्गत १७० किलोमीटर आणि यु.आय.डी.एस.एस.एम.टी. योजनेअंतर्गत २६६ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, काही भागात वाढीव जलवाहिनी टाकली जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेने जलवाहिनी टाकण्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीला जलवाहिनीला आवश्यक त्या ठिकाणी व्हॉल्व्ह बसविणे, पाण्याचे वितरण करण्यासाठी जलवाहिनीतून येणाºया पाण्याची चाचणी घेणे ही कामे शिल्लक आहेत. जलवाहिनी अंथरण्याचे काम जवळपास पूर्ण झाल्याने आता ही योजना दृष्टीक्षेपात आली असून, लवकरच योजनेअंतर्गत शहराला पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.अतिवृष्टी : कामांवर झाला परिणाम४येलदरीपासून ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र जिंतूर रस्त्याला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे आधी टाकलेली जलवाहिनी काढून ती रस्त्याच्या कडेने टाकण्याचे काम हाती घ्यावे लागले.४७ कि.मी. अंतराचे हे काम सुरू केल्यानंतर जिल्ह्यात परतीच्या पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे या कामात व्यत्यय निर्माण झाला होता. मात्र पाऊस थांबल्यानंतर हे कामही पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील जलवाहिनीच्या कामावरच महापालिकेने लक्ष केंद्रीत करुन ही कामे पूर्ण करुन घेतली आहेत.४शहरातील किरकोळ कामे बाकी असून, डिसेंबर महिन्यापर्यंत शिल्लक कामेही पूर्ण करण्याचे नियोजन मनपाने केले आहे.१५ जलकुंभांतून पाण्याचे वितरण४शहरातील सर्व विभागामध्ये समान पाण्याचे वितरण व्हावे, या उद्देशाने नवीन योजनेअंतर्गत मनपाने १५ जलकुंभाचे नियोजन केले आहे. त्यातील काही जलकुंभ अमृत योजनेअंतर्गत बांधले जात आहेत तर काही जलकुंभांचे काम यु.आय.डी. योजनेअंतर्गत यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे.४बहुतांश जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीला पार्वतीनगर येथील जलकुंभाचे काम स्लॅब लेव्हलपर्यंत आले असून, हे काम पूर्ण करुन घेण्याचे लक्ष्य मनपाने ठेवले आहे. पाणी साठवण्यासाठी जलकुंभ तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष जलवाहिनीतून जलकुंभापर्यंत पाणी आणण्याची चाचणी घेतली जाणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याला सुरुवात केली जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRainपाऊस