शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

परभणी : ४ गावांतील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:44 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.राज्यात दुष्काळाने होरपळलेल्या १५१ तालुक्यातील शेतकºयांना राज्य शासनाने अनुदान जाहीर केले आहे. या संदर्भात २५ जानेवारी रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला. हे अनुदान दोन टप्प्यात दिले जाणार असून बागायती पिकांसाठी ९ हजार रुपये हप्ता या प्रमाणे दोन टप्प्यात १८ हजार रुपये हेक्टरी अनुदान तर खरीप व रबी पिकांसाठी ३ हजार ४०० रुपये हप्त्याप्रमाणे ६ हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान दोन टप्यात जमा केले आहे. मानवत तालुक्याला २४ कोटी ८१ लाख २० हजार रुपये प्राप्त झाले होते. यामध्ये तालुक्यातील ५३ गावांतील शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचा पहिला हप्ता तर ४९ गावांतील शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. मात्र मानवत, मंगरुळ बु., वझूर बु., हमदापूर या गावांतील एकूण ४ हजार ३३७ शेतकरी दुसºया हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांचे १ कोटी ३ लाख ६५ हजार ९६४ रुपयांचे अनुदान मागील पाच महिन्यांपासून थकले आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ेलोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने प्रशासनाकडून आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. २६ मे रोजी निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंंतर एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत अनुदान वर्ग केले नाही. मानवत शिवारातील १९०२, मंगरूळ बु. १२०४, वझूर बु. येथील ५९६, हमदापूर ६३५ असे एकूण ४ हजार ३३७ शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार