शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : हेक्टरी २० हजारांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 23:32 IST

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी शासनाने देऊ केलेल्या मदतीनंतरही उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सरासरी २० हजार रुपयांचा फटका सहन करावा लागत असून आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी शासनाने देऊ केलेल्या मदतीनंतरही उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सरासरी २० हजार रुपयांचा फटका सहन करावा लागत असून आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी होत आहे़आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली़ दोन आठवडे हा पाऊस बरसला़ अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर येऊन पिकांचे नुकसान झाले़ यावर्षी जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाचे पीक तरारून आले होते़ विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यातच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून ठेवली होती़ तर शेतात उभे असलेले पीक काढणीच्या तयारीत होते़ या परिस्थितीत अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजविला़ ओढे आणि नाल्यांना आलेल्या पुरामध्ये अनेक शेतकºयांचे सोयाबीन पाण्यात वाहून गेले़ त्याच प्रमाणे शेतात उभे असलेले आणि काढून ठेवलेल्या सोयाबीनचे जागेवरच नुकसान झाले़ काढून ठेवलेल्या सोयाबीनलाही मोड फुटू लागले़ तर शेतातील उभे सोयाबीन काळवंडून गेले़ जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सोयाबीनचा पेरा वाढला आहे़ कापसाच्या बरोबरीने या पिकाला नगदी पीक म्हणून ओळख मिळू लागली आहे़ याच पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला़ विमा नुकसान भरपाई संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही़ परंतु, महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने जिरायती पिकांसाठी हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे़ ही मदत तुटपुंजी आहे़ जाहीर केलेल्या मदतीपैकी केवळ २५ टक्के रक्कम सद्यस्थितीला जिल्ह्याला प्राप्त झाली़सोयाबीन पिकाच्या उत्पादनाचा खर्च पाहता निम्मीही मदत शेतकºयांच्या हाती पडत नाही़ सर्वसाधारणपणे सोयाबीन पिकाचा जिल्ह्यातील उतारा लक्षात घेता प्रती हेक्टरी १५ क्विंटल सोयाबीन शेतकºयांच्या हातात पडते़ या सोयाबीनला बाजारभावाप्रमाणे ३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव गृहित धरला तर हेक्टरी ४५ हजार रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या हातात या हंगामातून मिळते़ अनेक शेतकºयांचे सोयाबीन वाहून गेले आहे़ परंतु, ज्यांचे पीक काळवंडले ते सोयाबीन देखील बाजारात येत आहे़ त्याला २ हजार रुपयांपर्यंतचा प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे़ तर शासनाकडून ८ हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे़ या सर्व पैशांची गोळाबेरीज केली असता, शेतकºयांना हेक्टरी २० हजार रुपयांचा फटका आजघडीला सहन करावा लागत आहे़ त्यामुळे शासनाने जिरायती पिकांसाठी किमान २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी होत आहे़कापूस उत्पादनातही आर्थिक झळ४खरीप हंगामातील कापसाचेही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे़ शेतात उभा असलेल्या कापसाला जागेवरच कोंब फुटले़ तसेच कापूस पिवळा पडला़ शेतात साचलेल्या पाण्याचा वेळेत निचरा झाला नाही़४त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला़ अशाही परिस्थितीत हाती आलेल्या कापसातून कमी अधिक प्रमाणात उत्पन्न मिळत आहे़ परंतु, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जिल्ह्यात प्रतीहेक्टरी ३० क्विंटल कापसाचा उतारा येतो़ त्याला सरासरी ५ हजार रुपयांचा भाव जरी मिळाला तरी एका हेक्टरमध्ये साधारणपणे दीड लाख रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या हाती पडते़ या उत्पन्नातील पिकावरील सुमारे ५० हजार रुपयांचा लागवडीचा खर्च वगळला तर १ लाख रुपयांचे उत्पन्न एका हंगामात मिळते़४यावर्षी कापूस पिकासाठीही हेक्टरी केवळ ८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे़ उतारा घटल्याने निघालेल्या कापसातून ३० ते ४० हजार रुपये हेक्टरी शेतकºयांच्या हाती पडतीलही; परंतु, या अतिवृष्टीमुळे शेतकºयांना हेक्टरी सरासरी तब्बल ५२ हजार रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे़तुटपुंजी मदत जिल्ह्याला प्राप्तजिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीपोटी प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून राज्य शासनाकडे ३१२ कोटी ४४ लाख रुपयांची मागणी केली आहे़ या मागणीच्या तुलनेत जिल्ह्याला २५ टक्के म्हणजे ८७ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या निधीचे शेतकºयांना वाटप सुरू झाले आहे़ सध्या तालुकास्तरावर शेतकºयांच्या याद्या तयार केल्या जात असून, थेट बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे़ परंतु, नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या, नुकसानीचा आकडा आणि मिळालेली मदत पाहता शेतकºयांना आर्थिक मदत देताना प्रशासनालाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ सध्या रबी हंगामाची लगबग सुरू झाली असून, राज्य शासनाने मागणी प्रमाणे रक्कम त्वरित वितरित करावी, तसेच वाढीव मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस