शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

परभणी : ७३ टक्के अंगणवाड्या भरतात इमारतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:47 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७३़५५ टक्के अंगणवाड्या या राज्य शासन किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये भरत असून, शहरी भागात मात्र ९५ टक्के अंगणवाड्या किरायाच्याच इमारतींमध्ये भरत असल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७३़५५ टक्के अंगणवाड्या या राज्य शासन किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये भरत असून, शहरी भागात मात्र ९५ टक्के अंगणवाड्या किरायाच्याच इमारतींमध्ये भरत असल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे़एकात्मिक बालविकास योजना हा केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत बहुउद्देशीय कार्यक्रम राबविण्यात येतो़ या कार्यक्रमाद्वारे मागास, शहरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात सहा वर्षाहून कमी वय असलेल्या बालकांच्या विकासासाठी व गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरींसाठी एकत्रित आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात़ या कार्यक्रमात अंगणवाड्यांची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत अंगणवाड्यांची शिघ्र पाहणी मोहीम डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत घेण्यात आली़ त्यानंतर त्याचा जुलै २०१७ मध्ये अहवाल प्रसिद्ध करण्यात आला़ या अहवालात अंगणवाड्यांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा, अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना देण्यात येणाºया आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, पूरक पोषण आहार, लाभार्थ्यांची संख्या, अंगणवाडी सेविकांच्या समस्या आदी विषयांची माहिती संकलित करण्यात आली़ या अहवालामध्ये अंगणवाड्या कुठे भरतात या विषयीची करण्यात आलेली आकडेवारी शहरी भागासाठी चकीत करणारी ठरली आहे़ ग्रामीण भागात राज्यात राज्य शासन किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीत ५९़०६ टक्के अंगणवाड्या भरतात़ परभणी जिल्ह्यात १७१७ पैकी १२६३ म्हणजे ७३़५५ टक्के अंगणवाड्या राज्य शासनाच्या किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरतात़शहरी भागाची जिल्ह्याची स्थिती अत्यंत वाईट आहे़ राज्यात ६़३ टक्के अंगणवाड्या नागरी भागात भरत असल्या तरी परभणी जिल्ह्यात १३४ पैकी फक्त ८ अंगणवाड्या शासनाच्या मालकीच्या इमारतीत भरतात़ उर्वरित १२६ अंगणवाड्या किरायाच्या इमारतीमध्येच भरतात़ ग्रामीण भागात मात्र राज्यात १२़६ टक्के तर जिल्ह्यात ३९ म्हणजे २़२७ टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीमध्ये भरतात़ प्राथमिक शाळांमध्ये राज्यात १०़४ टक्के अंगणवाड्या भरतात़ जिल्ह्यात १८३ म्हणजे १०़६५ टक्के अंगणवाड्या प्राथमिक शाळांमध्ये भरतात़ इतर ठिकाणी राज्यात १२ टक्के अंगणवाड्या भरतात़तर जिल्ह्यात ११५ म्हणजे ७ टक्के अंगणवाड्या इतर ठिकाणी भरत असल्याची बाब या अहवालाद्वारे समोर आली आहे़ ग्रामीण भागातील ९८ टक्के तर शहरी भागातील ९७ टक्के अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी आढळून आले़ ग्रामीण भागात २५ टक्के अंगणवाड्यांमध्ये हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याचे दिसून आले़नागरी भागात ५़६ टक्केच अंगणवाड्यांमध्ये हातपंपाचे पिण्यासाठी पाणी वापरत असल्याचे समोर आले़ ग्रामीण भागातील २ टक्के अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आढळून आले नाहीत़ शहरी भागात मात्र ही स्थिती ३ टक्के आढळून आली़ ग्रामीण भागातील ४२़६ टक्के अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र स्वयंपाक घर तर शहरातील फक्त ५़२ टक्के अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र स्वयंपाक घर आढळून आले़५४% अंगणवाड्यांमध्ये: शौचालयाची सुविधा४राज्यामध्ये एकीकडे शासनाच्या वतीने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे़ यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी शासकीय इमारतींमध्ये मात्र या शौचालयांची गंभीर स्थिती अनेक वेळा आढळून आली आहे़ जेथे शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे़ तेथील बहुतांश शौचालये नियमित स्वच्छता नसल्याने वापराअभावी बंद पडले आहेत़ अशीच स्थिती अंगणवाड्यांमधील आहे़ राज्यातील ग्रामीण भागात फक्त ५३़७ टक्के अंगवाड्यांनाच वापरण्यायोग्य शौचालयांची सुविधा उपलब्ध होती़ उर्वरित ४७़३ टक्के अंगणवाड्यांना शौचालयेच नसल्याची बाब या पाहणी अहवालातून समोर आली़ नागरी भागातही फारसी समाधानकारक स्थिती नव्हती़ नागरी भागातील ५४़१ टक्के अंगणवाड्यांमध्ये वापरायोग्य शौचालय आढळून आले़ उर्वरित ४३़९ टक्के अंगणवाड्यांमध्ये गंभीर स्थिती आढळून आली़

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी