शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

परभणी :२७ लाख मे़ टन ऊस उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:42 AM

जिल्ह्यात यावर्षी जायकवाडी व निम्न दुधना प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने जवळपास ४५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे़ यामधून २७ लाख ४२ हजार मे़ टन ऊस उपलब्ध होणार आहे़ उपलब्ध उसाच्या तुलनेत गाळपासाठी साखर कारखान्यांची उपलब्धता कमी असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात यावर्षी जायकवाडी व निम्न दुधना प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने जवळपास ४५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे़ यामधून २७ लाख ४२ हजार मे़ टन ऊस उपलब्ध होणार आहे़ उपलब्ध उसाच्या तुलनेत गाळपासाठी साखर कारखान्यांची उपलब्धता कमी असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़गतवर्षी नगर व नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण १०० टक्के भरले होते़ त्यामुळे या धरणातील पाणी गोदावरी नदीपात्रात नंतरच्या काळात सोडण्यात आले़ या पाण्याचा पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या तालुक्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात फायदा झाला़ या शिवाय सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पातही गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले़ जवळपास ९० टक्के हा प्रकल्प भरला होता़ त्यामुळे या प्रकल्पातूनही दुधना नदी व डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले़ या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला़ परिणामी हमखास उत्पन्न मिळणारे पीक म्हणून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे़ गतवर्षी फक्त ९ हजार हेक्टर जमिनीवर जिल्हाभरात ऊस लागवड झाली होती़यावर्षी मात्र तब्बल ४५ हजार ७०० हेक्टर जमिनीवर उसाची लागवड झाली आहे़ त्यामुळे यावर्षी ऊस गाळपाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो़ जिल्ह्यात एकूण ५ साखर कारखाने असून, त्यामध्ये आमडापूर येथील त्रिधारा शुगर साखर कारखान्याची २ हजार ५०० टीसीडी गाळप क्षमता आहे़ तसेच पूर्णा तालुक्यातील बळीराजा साखर कारखान्याची ३ हजार ५०० टीसीडी, गंगाखेड शुगर एनर्जी साखर कारखान्याची ६ हजार टीसीडी व पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर कारखान्याची १८०० टीसीडी आणि पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील रेणुका शुगर लि़ साखर कारखान्याची १२५० टीसीडी गाळप क्षमता आहे़ या पाच कारखान्यांची एकूण गाळप क्षमता १५ हजार ५० टीसीडी आणि गाळप हंगाम १६० दिवसांचा गृहित धरल्यास एकूण २४ हजार ८०० मे़ टन उसाचे गाळप होवू शकतो़यापैकी काही ऊस गुºहाळ, जनावरे, चारा व रसवंत्यांसाठी वापरला जाऊ शकतो़ त्यामुळे ऊस गाळपाचा प्रश्न उपस्थित राहणार नाही, असे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास वाटते़ परंतु, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात एकूण २७ लाख ४२ हजार मे़ टन ऊस उपलब्ध होवू शकतो, ही शासकीय आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक ऊस उपलब्ध होणार आहे़ अशातच सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शुगर कारखाना बंद असल्याने या तालुक्यातील ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार आहे़ त्यामुळे सोनपेठ तालुक्याचा ऊस परळीलाच जाण्याची शक्यता आहे़ परळी येथील साखर कारखान्याच्या परीक्षेत्रात अगोदरच मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झालेली आहे़ त्यामुळे तेथील ऊस संपविण्याचे परळीच्या कारखान्यासमोर आव्हान असणार आहे़ परिणामी सोनपेठ तालुक्याचा ऊस परळीचा कारखाना घेईल की नाही? हाही प्रश्न उपस्थित होत आहे़मे महिन्यात : झाली होती आढावा बैठकजिल्ह्यातील उसाच्या प्रश्नावर जिल्हा कृषी अधीक्षक, साखर कारखान्यांचे कृषी अधिकारी आणि साखर प्रादेशिक सहसंचालक नांदेड यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली होती़ या बैठकीत उसाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली़ त्यामध्ये जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाच साखर कारखान्यांची गाळप क्षमता अधिक असल्याने शेतकºयांच्या ऊस गाळपाचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता वाटत नाही, असे सांगण्यात आले़ त्यानंतर मात्र या संदर्भात आढावा बैठक झालेली नाही़ चार महिन्यानंतर जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे़ परिणामी या संदर्भात पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीSugar factoryसाखर कारखानेWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प