शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १०० टँकरचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:54 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत या निविदा अंतिम होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत या निविदा अंतिम होणार आहेत.परतीचा पाऊस झाला नसल्याने यावर्षी जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल दोन महिन्यांचा पावसाचा खाडा राहिल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तसेच भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे येथून पुढे ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडे जाहीर केले होते. या कृती आराखड्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यापर्यंत काम करण्याची वेळ प्रशासनावर आली नसली तरी भविष्यात मात्र पाणीटंचाईच्या निवारणासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत.सध्याची परिस्थिती लक्षात घेता टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत चालली आहे. पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना ठप्प पडू लागल्या असून गावातील पाणीसाठा संपत असल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर ओढावली आहे. टंचाई परिस्थितीत ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन आठ दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. यावर्षी १०० पेक्षा अधिक टँकर लावण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. या निविदा प्रक्रिया अंतिम करण्याची वेळ आली असून येत्या एक- दोन दिवसांमध्ये प्रत्यक्ष टँकरचे आदेश काढले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.१२३ रुपये प्रति मे टन भाडे४जिल्ह्यामध्ये करार तत्वावर टँकर्स घेतले जात असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या टँकरचे दरही निश्चित झाले आहेत. त्यामुळे मंगळवारपर्यंत भाडे तत्वावर लावल्या जाणाऱ्या टँकर्सची निश्चिती केली जाणार आहे. अंतिम झालेल्या निविदांमधून पाणीपुरवठ्यासाठी घेतलेल्या टँकरला १२३ रुपये प्रति दिन प्रति मे.टन भाडे दिले जाणार आहे. तर प्रवासासाठी १.८९ रुपये प्रति मे. टन प्रति कि.मी. या दराने टँकर्स लावले जाणार आहेत.५४ वाढीव टँकरचे नियोजन४मागील वर्षी जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. संपूर्ण उन्हाळ्यामध्ये प्रशासनाला ४६ टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा करावा लागला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे. त्यामुळे १०० टँकरचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून पुढील वर्षातील मार्च महिन्यापर्यंत टँकरची संख्या १०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई