शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परभणी : १०० टँकरचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:54 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत या निविदा अंतिम होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत या निविदा अंतिम होणार आहेत.परतीचा पाऊस झाला नसल्याने यावर्षी जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल दोन महिन्यांचा पावसाचा खाडा राहिल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तसेच भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे येथून पुढे ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडे जाहीर केले होते. या कृती आराखड्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यापर्यंत काम करण्याची वेळ प्रशासनावर आली नसली तरी भविष्यात मात्र पाणीटंचाईच्या निवारणासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत.सध्याची परिस्थिती लक्षात घेता टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत चालली आहे. पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना ठप्प पडू लागल्या असून गावातील पाणीसाठा संपत असल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर ओढावली आहे. टंचाई परिस्थितीत ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन आठ दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. यावर्षी १०० पेक्षा अधिक टँकर लावण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. या निविदा प्रक्रिया अंतिम करण्याची वेळ आली असून येत्या एक- दोन दिवसांमध्ये प्रत्यक्ष टँकरचे आदेश काढले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.१२३ रुपये प्रति मे टन भाडे४जिल्ह्यामध्ये करार तत्वावर टँकर्स घेतले जात असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या टँकरचे दरही निश्चित झाले आहेत. त्यामुळे मंगळवारपर्यंत भाडे तत्वावर लावल्या जाणाऱ्या टँकर्सची निश्चिती केली जाणार आहे. अंतिम झालेल्या निविदांमधून पाणीपुरवठ्यासाठी घेतलेल्या टँकरला १२३ रुपये प्रति दिन प्रति मे.टन भाडे दिले जाणार आहे. तर प्रवासासाठी १.८९ रुपये प्रति मे. टन प्रति कि.मी. या दराने टँकर्स लावले जाणार आहेत.५४ वाढीव टँकरचे नियोजन४मागील वर्षी जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. संपूर्ण उन्हाळ्यामध्ये प्रशासनाला ४६ टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा करावा लागला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे. त्यामुळे १०० टँकरचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून पुढील वर्षातील मार्च महिन्यापर्यंत टँकरची संख्या १०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई