शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

परभणी : १०० टँकरचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:54 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत या निविदा अंतिम होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत या निविदा अंतिम होणार आहेत.परतीचा पाऊस झाला नसल्याने यावर्षी जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल दोन महिन्यांचा पावसाचा खाडा राहिल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तसेच भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे येथून पुढे ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडे जाहीर केले होते. या कृती आराखड्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यापर्यंत काम करण्याची वेळ प्रशासनावर आली नसली तरी भविष्यात मात्र पाणीटंचाईच्या निवारणासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत.सध्याची परिस्थिती लक्षात घेता टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत चालली आहे. पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना ठप्प पडू लागल्या असून गावातील पाणीसाठा संपत असल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर ओढावली आहे. टंचाई परिस्थितीत ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन आठ दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. यावर्षी १०० पेक्षा अधिक टँकर लावण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. या निविदा प्रक्रिया अंतिम करण्याची वेळ आली असून येत्या एक- दोन दिवसांमध्ये प्रत्यक्ष टँकरचे आदेश काढले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.१२३ रुपये प्रति मे टन भाडे४जिल्ह्यामध्ये करार तत्वावर टँकर्स घेतले जात असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या टँकरचे दरही निश्चित झाले आहेत. त्यामुळे मंगळवारपर्यंत भाडे तत्वावर लावल्या जाणाऱ्या टँकर्सची निश्चिती केली जाणार आहे. अंतिम झालेल्या निविदांमधून पाणीपुरवठ्यासाठी घेतलेल्या टँकरला १२३ रुपये प्रति दिन प्रति मे.टन भाडे दिले जाणार आहे. तर प्रवासासाठी १.८९ रुपये प्रति मे. टन प्रति कि.मी. या दराने टँकर्स लावले जाणार आहेत.५४ वाढीव टँकरचे नियोजन४मागील वर्षी जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. संपूर्ण उन्हाळ्यामध्ये प्रशासनाला ४६ टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा करावा लागला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे. त्यामुळे १०० टँकरचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून पुढील वर्षातील मार्च महिन्यापर्यंत टँकरची संख्या १०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई