शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

परभणी: निराधार योजनेची १ हजार प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:49 PM

आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरावरील समिती गठित होत नसल्याने १ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ९ महिन्यांपासून या संबंधी एक ही बैठक न झाल्याने या प्रकरणाचा निपटारा होत नाही. यामुळे वृद्ध निराधार तहसील कार्यालयात खेट्या मारीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरावरील समिती गठित होत नसल्याने १ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ९ महिन्यांपासून या संबंधी एक ही बैठक न झाल्याने या प्रकरणाचा निपटारा होत नाही. यामुळे वृद्ध निराधार तहसील कार्यालयात खेट्या मारीत आहेत.सामाजिक न्याय विभागाच्या विशेष योजनेंतर्गत निराधार घटकासाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना या दोन राज्य सरकारच्या व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा, निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्तीवेतन योजना, आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना या योजना केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान देण्यात येते. योजनेतील लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवडीसाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीने तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात येते.आघाडी सरकारच्या काळात समिती स्थापन झाली होती. विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ता परिवर्तन होऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. सरकारला ५ वर्षे पूर्ण होत असताना संजय गांधी निराधार योजनेची समिती स्थापन झाली नाही.सद्यस्थितीत तहसीलदार डी.डी. फुफाटे यांच्याकडे प्रस्ताव मंजुर करण्याचे अधिकार आहेत. गत वर्षी आॅक्टोबर महिन्यात बैठक घेऊन प्रस्तावाची छाननी करण्यात होती. यानंतर जून अखेरीस जवळपास ८०० प्रस्ताव दाखल झाले आहेत.या आकड्यांवरून हजारांवर प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती मिळत आहे. समिती स्थापन होत नसल्याने निराधारांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. समिती स्थापनेची वाट न बघता तहसीलदारांनी आपल्या अधिकारात लवकरात लवकर बैठक घेऊन या प्रकरणाचा निपटारा करण्याची मागणी निराधार वृद्धांतून केली जात आहे.निराधारांवर उपासमारीची वेळ४केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना या दोन राज्य सरकारच्या व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा, निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्तीवेतन योजना, आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान देण्यात येते.४या अनुदानावर निराधार महिन्याची गुजराण करतात. मात्र मागील काही वर्षापासून या अनुदानासाठी निराधार वृद्ध तहसील प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करीत आहेत; परंतु, या प्रस्तावावर वर्षानुवर्षे कोणतीच कार्यवाही होत नसल्याने विविध योजनेतील निराधारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.लोकसभा, नगरपालिका, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बैठकीला विलंब झाला आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रकरणाचा लवकरच बैठक घेऊन निपटारा करुन पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येईल.- डी डी फुफाटे, तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदार