शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

परभणी जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील कापसाचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:12 AM

जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस अळीने बाधित असल्याने आणखी दीड लाख हेक्टरवरील पंचनामे शिल्लक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस अळीने बाधित असल्याने आणखी दीड लाख हेक्टरवरील पंचनामे शिल्लक आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित केले होते़ प्रत्यक्षात शेतकºयांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाची १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर लागवड केली़ प्रस्तावित क्षेत्रांपैकी ९१ टक्के कापसाची लागवड झाली़ विशेष म्हणजे, यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली होती़ गतवर्षी सोयाबीन पिकाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही़ त्यामुळे यावर्षी पर्जन्यमान चांगले होणार असल्याच्या अंदाजावरुन शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली़ अपेक्षेप्रमाणे शेतकºयांचे कापूस पीक बहरले़दिवाळीपासून जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला सुरुवात झाली़ मात्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पहिली वेचणी झाल्यानंतर कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला़ त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक बोंडअळीने हिरावून नेले़ कापूस उत्पादक अडचणीत सापडला़ बोंडअळी नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच गेली़ परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनू लागली़ बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात सर्वच तालुक्यातून कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या़ वाढत्या तक्रारी लक्षात घेता, कृषी विभागानेही या संकटाचे गांभीर्य ओळखले़ तक्रारींचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर सुरुवातीला शेतकºयांकडून रितसर तक्रार अर्ज भरून घेण्यात आले. आता तर थेट पंचनामेच करण्याचे आदेश कृषी विभागाला मिळाले आहे.कृषी विभागाने पंचनामे सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रापैकी ३५ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत़ परभणी तालुक्यात ६ हजार ४०४ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे तालुका कृषी कार्यालयाकडून तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी आदींनी पूर्ण केले आहे़ गंगाखेड १ हजार ४५०, पाथरी २ हजार २०५, जिंतूर १ हजार ४१०, पूर्णा ६ हजार ५४७, पालम १ हजार ५३२, सेलू १२ हजार ५६, सोनपेठ ७८५ आणि मानवत तालुक्यात २ हजार ७४२ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़शेतकºयांच्या नजरा मदतीकडे४कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़ दरवर्षी पिकांवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे़ यावर्षी पीक चांगले येऊनही त्यातून उत्पन्न हाती लागले नाही़ कापूस उत्पादकांनी यावर्षी लागवड केलेल्या पावणेदोन लाख हेक्टरवरील कापूस पीक बाधित झाले आहे़ बाधित शेतकरी सध्या शासनाकडून मिळणाºया मदतीची प्रतीक्षा करीत आहे़ शासनाने दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये कोरडवाहूसाठी प्रती हेक्टरी ३० हजार रुपये व बागायतीसाठी प्रती हेक्टरी ३७ हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे़ मात्र या मदतीचे निकष अजून स्पष्ट झालेले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांच्या नजरा सध्या शासकीय मदतीकडे आहेत़सरसकट मदत द्याजिल्ह्यातील कापूस लागवडीचे सर्व क्षेत्र बोंंडअळीने बाधित झाले असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे़ त्यामुळे कापूस उत्पादक हतबल झाला आहे़ शासनाने कापूस उत्पादक शेतकºयांना मदत देताना कोणतेही निकष न ठेवता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी कापूस उत्पादकांतून होत आहे़९२ हजार ८२४ कापूस उत्पादकांना फटकाजिल्ह्यामध्ये ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत़ यातील ९२ हजार ८२४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीपात कापसाची लागवड केली़ मात्र कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांनी पिकावर केलेला अर्धा खर्च उत्पादनातून निघालेला नाही़ त्यामुळे या शेतकºयांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी कृषी विभागाच्या बाधीत झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत़ आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील ९२ हजार ८२४ शेतकºयांपैकी केवळ ३९ हजार २२३ शेतकºयांचेच पंचनामे पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे जवळपास ५० हजार शेतकºयांचे पंचनामे येत्या काळात कृषी विभागाला पूर्ण करावयाचे आहेत़