शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात पालम पं.स. मध्ये पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:21 IST

येथील पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. संपूर्ण तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयातच पाणी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): येथील पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. संपूर्ण तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयातच पाणी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पालम शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये दुसºया मजल्यावर पंचायत समितीचे कार्यालय आहे. ग्रामीण भागातील विकासासंदर्भात दैनंदिन कामासाठी ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती सदस्य आदींसह जबाबदार लोकप्रतिनिधींची नेहमीच या कार्यालयात उठ-बस असते. पंचायत समितीला कार्यालयाला पाणीपुरवठा करणारी विंधन विहीर मागील अनेक दिवसांपासून कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या इमारतीवर टाक्यांमध्ये पाणीच शिल्लक नाही. टँकरने पाणी घेणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या परिसरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झालेला आहे.विशेष म्हणजे, पिण्यासाठी तर सोडाच सांडपाणीही उपलब्ध नसल्याने लोकप्रतिनिधींसह महत्त्वाच्या कार्यालयात पाण्याअभावी शौचालय बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयालाही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याचे दिसत आहे.तालुकाभरात उपाययोजना; पं.स.त मात्र हतबलता४यावर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी कोरडीठाक पडली असून गावतलवातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.४टंचाईग्रस्त गावातील ग्रामपंचातीच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. पाणींटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीतील अधिकाºयांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? या विषयावर पंंचायत समिती कार्यालयात बसूनच नियोजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पंचायत समितीच्या कार्यालयातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला असताना या कार्यालयातील पाण्याचा प्रश्न अधिकारी सोडवू शकले नाहीत, असेच म्हणावे लागेल. सध्या तरी येथील अधिकारी , कर्मचाºयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ