शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'माझ्या वेदना गौण, आरक्षणच महत्त्वाचं!'; पाय फ्रॅक्चर असूनही शेतमजूराचे मुंबईत पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:22 IST

गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने वेळोवेळी पाय फ्रॅक्चर असताना आझाद मैदानावर, आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

- विठ्ठल भिसेपाथरी : पाय दुखतोय, पण लेकरांच्या भविष्यासाठी आंदोलन थांबवणं शक्य नाही. माझ्या वेदना गौण आहेत; आरक्षण महत्त्वाचं आहे, असं सांगत पायाला फ्रॅक्चर झालेल्या अवस्थेतच पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथील शेतकरी विठ्ठल काळे (४०) मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले. गंगाखेड, परभणी येथील संदीप गव्हाणे यांनी सायकलवरून मुंबई गाठली आहे. सारोळा बु. येथील तरुणांनी तर आंदोलनस्थळी मुंडण आंदोलन करीत निषेध केला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच केल्याच्या दिवशीपासून परभणी जिल्ह्यातील गावागावांतून समाज बांधवांचे मोर्चे निघाले. पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगावसारख्या गावातून सत्तर ते ऐंशी तरुण, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. यात विठ्ठल काळे यांच्या पायाला प्लास्टर असतानाही काळे यांनी आंदोलनात जाण्याचा निर्धार केला. पुढच्या पिढ्यांसाठी आरक्षण महत्त्वाचं असून, यासाठी माझ्या वेदना गौण असल्याचे म्हणत ते आंदोलनात सहभागी झाले. गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने ते वेळोवेळी आझाद मैदानावर जात असून, आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

कष्टाचं जीनं येणाऱ्या पिढ्यांना नको...विठ्ठल काळेंकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यातून कसाबसा संसार चालतो. उरलेला वेळ मजुरी करून घराचा गाडा हाकतो. मुलगी डॉक्टर व्हावी, मुलगा इंजिनीअर व्हावा, असं स्वप्न मी पाहतो. पण, पैशाअभावी त्यांचं शिक्षण थांबू नये. माझ्यासारखे अनेक समाजबांधव अशा स्थितीत आहेत. त्यामुळे आरक्षण मिळणं आवश्यक असल्याचं काळे म्हणाले.

पाथरी तालुक्यातील आंदोलनाची परंपरापाथरी तालुक्यातील मराठा आंदोलनाची धग सुरुवातीपासूनच प्रखर आहे. गावागावांतून समाजबांधव सहभागी होत आहेत. त्यामुळे पाथरी तालुका मराठा आरक्षण लढ्यात जिल्ह्याचा कणा ठरत आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी