शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात, परीक्षांच्या तारखांचा लागला घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST

परभणी : दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे एमपीएससी परीक्षांच्या तारखा लांबल्या जात आहेत. एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून ...

परभणी : दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे एमपीएससी परीक्षांच्या तारखा लांबल्या जात आहेत. एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जात आहे. जर वेळेत परीक्षा झाली नाही तर या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने परीक्षेची तारीख जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी प्रशासनात चांगल्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या तयारीसाठी खासगी नोकरीला बाजूला ठेवून दोन-तीन वर्षे तयारीत घालविले जातात. मात्र मागच्या दीड वर्षापासून एमपीएससी परीक्षांच्या तारखा वेळोवेळी लांबविला जात आहेत. कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत एमपीएससी परीक्षा घेण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष वाया जात असून, अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची उदासीनता आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर परीक्षा घेणे गरजेचे आहे. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर न करता अशीच परिस्थिती ठेवणे विद्यार्थी, प्रशासन आणि समाजघटकासाठी अहितकारक आहे. तेव्हा एमपीएससीच्या परीक्षा त्वरित द्याव्यात, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे.

यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?

मागील वर्षी दोन वेळा एमपीएससी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आला. यावर्षीदेखील अद्याप परीक्षा घेण्यासंदर्भात प्रशासनाकडून तारीख जाहीर झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.

ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार?

कोरोना संसर्गामुळे ऑफलाइन शिकवणी वर्ग घेण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस घेतले जात आहेत. मात्र ऑनलाइन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची तयारी अपेक्षेनुसार होत नाही. एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी समजदार असतात. सध्या कोरोनाचा संसर्गही कमी झाला आहे. तेव्हा ऑफलाइन क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोट

शाळा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यात मोठा फरक आहे. या विद्यार्थ्यांमध्ये समजदारपणा असतो. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे ठरावीक नियम घालून आणि विद्यार्थी संख्येची मर्यादा ठरवून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे. तसेच एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षा होत नसल्याने नाउमेद होत आहेत. या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर परीक्षा घेणे गरजेचे आहे.

- जगदीश कानडे