शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात, परीक्षांच्या तारखांचा लागला घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST

परभणी : दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे एमपीएससी परीक्षांच्या तारखा लांबल्या जात आहेत. एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून ...

परभणी : दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे एमपीएससी परीक्षांच्या तारखा लांबल्या जात आहेत. एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जात आहे. जर वेळेत परीक्षा झाली नाही तर या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने परीक्षेची तारीख जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी प्रशासनात चांगल्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या तयारीसाठी खासगी नोकरीला बाजूला ठेवून दोन-तीन वर्षे तयारीत घालविले जातात. मात्र मागच्या दीड वर्षापासून एमपीएससी परीक्षांच्या तारखा वेळोवेळी लांबविला जात आहेत. कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत एमपीएससी परीक्षा घेण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष वाया जात असून, अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची उदासीनता आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर परीक्षा घेणे गरजेचे आहे. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर न करता अशीच परिस्थिती ठेवणे विद्यार्थी, प्रशासन आणि समाजघटकासाठी अहितकारक आहे. तेव्हा एमपीएससीच्या परीक्षा त्वरित द्याव्यात, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे.

यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?

मागील वर्षी दोन वेळा एमपीएससी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आला. यावर्षीदेखील अद्याप परीक्षा घेण्यासंदर्भात प्रशासनाकडून तारीख जाहीर झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.

ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार?

कोरोना संसर्गामुळे ऑफलाइन शिकवणी वर्ग घेण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस घेतले जात आहेत. मात्र ऑनलाइन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची तयारी अपेक्षेनुसार होत नाही. एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी समजदार असतात. सध्या कोरोनाचा संसर्गही कमी झाला आहे. तेव्हा ऑफलाइन क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोट

शाळा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यात मोठा फरक आहे. या विद्यार्थ्यांमध्ये समजदारपणा असतो. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे ठरावीक नियम घालून आणि विद्यार्थी संख्येची मर्यादा ठरवून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे. तसेच एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षा होत नसल्याने नाउमेद होत आहेत. या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर परीक्षा घेणे गरजेचे आहे.

- जगदीश कानडे