शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

परभणीत निकालासाठी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:37 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून गेल्या चार महिन्यांपासून विविध विषयांच्या परीक्षांचे निकाल लावले जात नसल्याच्या कारणावरुन व अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून गेल्या चार महिन्यांपासून विविध विषयांच्या परीक्षांचे निकाल लावले जात नसल्याच्या कारणावरुन व अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सर्व पदवी शाखेच्या परीक्षांचा निकाल लागला नसल्याने विद्यार्थ्यांना आयसीआर, एमसीएईआर आदी उच्च शिक्षणाच्या प्रवेशापासून वंचित रहावे लागत आहे. या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही गेल्या चार महिन्यांपासून निकाल लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एनएसयुआय, एआयएसएफ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर कुलगुरु डॉॅ.अशोक ढवन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी एनएसयुआयचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, एआयएसएफचे जिल्हाध्यक्ष विश्वास कदम, संदीप सोळंके, अ‍ॅड.लक्ष्मण काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक वारकरी आदींची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांच्या विविध मागण्याकृषी विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे शुल्क कमी करावे, दोन वर्षापासून प्रलंबित असलेले विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अदा करावे, यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता तात्काळ द्यावा, आयसीईआरकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वितरित करावी, ३ वर्षापासून प्रलंबित असलेली एससी, एसटी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रदान करावी, ईबीसी सवलत देण्यात यावी, पीएच.डी.च्या जागांवर विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात यावा आदी मागण्या आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीagricultureशेतीagitationआंदोलन