शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

मोबाइलने मेमरी घालविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST

परभणी : मोबाइलच्या क्रांतीनंतर मोबाइलवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. ही डिपेंडन्सी नागरिकांच्या स्मरणशक्तीसाठी घातक ठरू लागली असून, पाठांतराचे ...

परभणी : मोबाइलच्या क्रांतीनंतर मोबाइलवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. ही डिपेंडन्सी नागरिकांच्या स्मरणशक्तीसाठी घातक ठरू लागली असून, पाठांतराचे प्रमाण कमी झाल्याने दैनंदिन जीवनावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पूर्वी दूरध्वनी क्रमांक असो अथवा एखादी महत्त्वाची बाब मुखपाठ असायची; परंतु आता मोबाइलचा वापर वाढला तसा मेंदूचा वापर कमी होत चालला असून, ही बाब धोकादायक ठरू शकते.

असे का होते?

एखाद्या व्यक्तीवर अथवा यंत्रावर अवलंबून राहिल्यानंतर स्वतःची कार्यक्षमता कमी होते. असाच प्रकार मोबाइलच्या बाबतीत होत आहे.

मोबाइलमध्ये नावासह क्रमांक नोंदविलेले असल्याने ते आपण जास्त गांभीर्याने घेत नाहीत. परिणामी, मोबाइल क्रमांक मुखपाठ राहत नाहीत.

त्याचप्रमाणे जवळच्या नातेवाइकांचे वाढदिवस, दैनंदिन करावयाची कामे या बाबीही मोबाइलमध्ये नोंद केल्या जात आहेत. त्यामुळे स्वतःच्या शक्‍तीचा वापर कमी होतो. परिणामी याबाबी स्मरणात राहत नाहीत.

हे टाळण्यासाठी

स्वतःची स्मरणशक्ती तल्लख करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना स्वावलंबनाचे धडे द्यावेत. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी छोट्या-छोट्या ट्रिकचा वापर करावा. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी असलेल्या छोट्या छोट्या खेळांचा वापर मुलांकडून करून घ्यावा, यंत्रांचा अनावश्‍यक वापर टाळावा.

माणसाची डिपेंडन्सी वाढली की, आपोआपच स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. स्वतःच्या मेमरीचा कमी वापर केल्याने असे प्रकार होतात. त्यामुळे अनावश्यक बाबींसाठी यंत्रांवर विसंबून राहू नये, प्रत्येकाला दोन स्मरणशक्ती असतात. एक शॉर्ट टाइम आणि एक परमनंट मेमरी. यंत्रांच्या वाढत्या वापरामुळे परमनंट मेमरीमध्ये काही गोष्टी ठेवण्याची सवय मोडत आहे. त्यामुळे स्वावलंबन वाढवून मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-डॉ. जगदीश नाईक, मानसोपचारतज्ज्ञ