शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

एसटी कर्मचाऱ्यांची दीड वर्षापासून लटकली वैद्यकीय बिले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST

परभणी विभागीय कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सात आगारांत जवळपास २ हजार ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. ...

परभणी विभागीय कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सात आगारांत जवळपास २ हजार ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात दोन-तीन महिने कर्मचाऱ्यांना पगारासाठी वाट पाहावी लागली. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य शासनाने ५०० कोटींचा निधी एसटी बस महामंडळाला देण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला. असे असले तरी दीड वर्षभरापासून वैद्यकीय बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन वेळेत वैद्यकीय बिले देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

एसटीच्या अधिकारी, कर्मचारी यांना जानेवारी २०२० पासुन वैद्यकीय बिले मिळत नसल्याने नियमीत वैद्यकीय उपचारासाठी अर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. मागील दोन महिन्याचे वेतन वेळवर झाले नव्हते .कर्मचार्यांना वैद्यकीय उपचारा अभावी उसनवारी करावी लागली आहे.सदरची उसनवारी परतफेड करण्यासाठी वैद्यकीय बिला बाबत स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली असता ही बिले अदा करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगीतल्या जाते. निधी अभावी कर्मचारी यांना घरसंसार व नियमीत उपचार घेणे देखील अडचणीचे झाले आहे. तसेच सेवा निवृत्त कर्मचारी यांचे शिल्लक रजेची रक्कम व फरक देखील वेळेत मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी यांना संसाराचा गाडा चालवणे देखील अवघड झाले आहे.

गोविंद वैदय, विभागीय सचिव

कोविड १९ मध्ये माझी पत्नी आजारी असल्याने मला त्या आजारामुळे ६ महिने दवाखान्यात दाखवावे लागले. त्यांच्या उपचारासाठी ३ लाख रुपये खर्च झाला. सदरचा खर्च नातेवाईक व इतराकडुन घेऊन केला आहे. या बिलाची फाईल विभागीय कार्यालयाकडे दिड वर्षापासून सादर केली आहे. ती मंजुर झाली आहे. परंतु सदरची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे नातेवाईक यांना उसनवारी परत करता न आल्याने नाराजी निर्माण होत आहे. व भविष्यात अडचण निर्माण झाल्यास नातेवाईक सुध्दा मदत करण्याची शक्यता नाही.

कृष्णा राडकर,चालक, परभणी आगार ॉ

एसटी कामगार अहोरात्र मेहनत करून प्रवाशी वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोविड १९ मध्ये सुध्दा कोरोना योध्दा म्हणुन काम केलेले आहे. त्या वेळी विषेश प्रोत्साहन भत्ता देखील अद्याप अदा केला नाही. तसेच कामगारांचे वैद्यकीय बिले अदा केली जात नाहीत. त्यामुळे कामगार हवाल दिल झाला. या घटनेला जबाबदार नसताना आम्हाला व आमच्या कुटुंबाला त्याच्या यातना भोगाव्या लागत आहेत.

रामभाऊ देवगुडे,चालक,परभणी आगार