शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

रक्षाबंधनास निघालेली विवाहिता माहेरी पोहोचलीच नाही; मुलासह विहिरीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:59 IST

जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील घटना; पत्नी आणि मुलासोबत असलेला पती मात्र गायब

बामणी (जि. परभणी) : रक्षाबंधनासाठी पतीसमवेत पत्नी आणि मुलगा हे तिघेजण रविवारी सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा गावाकडून बामणी येथे विवाहितेच्या माहेरी येत होते. बामणीजवळील मानकेश्वर येथे बस बदलण्यासाठी तिघेही उतरले होते. मात्र, यानंतर तीन दिवसांनी यातील विवाहिता आणि तीन वर्षांचा मुलगा यांचा मृतदेह एका शेतातील विहिरीत तरंगताना आढळल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. यामुळे या मृत्यूबाबत आता शंका उपस्थित होत आहेत; तर पती मात्र गायब असल्याचे समोर आले.

याबाबत माहिती अशी की, बामणी येथील गोविंदराव जिजाराव जाधव यांची मुलगी शारदा हिचा विवाह जांभोरा (ता. सिंदखेडराजा) येथील भारत देशमुख यांच्यासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. शारदा भारत देशमुख (२७) हिला तीन वर्षांचा आदर्श नावाचा मुलगा होता. १० ऑगस्टला बामणी येथे अशोक गोविंद जाधव या भावाकडे रक्षाबंधनानिमित्त पती भारत देशमुख यांच्यासोबत येत असताना येलदरीनजीक माणकेश्वरपर्यंत शारदा देशमुख मुलासह आली होती. बामणीला येण्यासाठी बस बदलून यावे लागते; म्हणून माणकेश्वरला पती व मुलासह बसची वाट पाहत ते थांबले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी ग्रामस्थांना सांगितले. बस येण्यास उशीर होत असल्याने माणकेश्वर येथील महादेव मंदिरात ते तिघे दर्शन घेण्यासाठी गेले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, यानंतर विहिरीत १३ ऑगस्टला शारदा व तिचा मुलगा आदर्श यांचा मृतदेह अशोक काकडे या शेतकऱ्याच्या विहिरीत तरंगत असताना आढळून आला. 

बामणी येथील ग्रामस्थांनी विवाहिता आपल्या गावची असावी म्हणून पाहावयास गर्दी केली होती. यानंतर दोघांचे मृतदेह विहिरीतून काढले असता त्यांची ओळख पटली. यात शारदा देशमुख आणि आदर्श देशमुख यांचे हे मृतदेह असल्याचे समोर आले. जिंतूर पोलिस ठाण्याला बामणी येथील दीपक देशमुख यांनी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यावरून जिंतूर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बालाजी पुंड, जमादार दत्तात्रेय गुंगाणे, यशवंत वाघमारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले व जागेवर डॉक्टरांच्या मदतीने शवविच्छेदन करण्यात आले आहे. अद्याप जिंतूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अंत्यसंस्कारानंतर गुन्हा नोंद करण्यात येईल, असे ग्रामस्थ, नातेवाइकांनी स्पष्ट केले.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू