शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पैस वाटपाने गाजल्या निवडणुका; दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:13 IST

गंगाखेडमधून शेकाप चारदा तर काँग्रेस, अपक्षांचा तीन वेळा विजय

ठळक मुद्देआर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांमुळे चर्चा वाढलीपैसे वाटपाने गाजली २०१४ ची निवडणूक

परभणी : गेल्या काही वर्षांपासून मतदानासाठी पैसे वाटल्याच्या कारणावरुन सातत्याने राज्यभर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत असली तरी या मतदारसंघात एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाने सलग चारवेळा तर काँग्रेसने तीनवेळा विजय मिळविला होता. मुंबईहून खास निवडणुकीसाठी आलेले सीताराम घनदाट यांनीही सलग तीन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 

१९६२ पासून २०१४ पर्यंत गंगाखेड विधानसभेची १२ वेळा निवडणूक झाली. त्यामध्ये तीनवेळा काँग्रेसने, चार वेळा शेकापने, तीनवेळा अपक्ष उमेदवाराने, भाजपा आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एकवेळा निवडणूक जिंकली. १९६२ ते २००४ पर्यत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. २००९ मध्ये हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी झाला. १९६२ मध्ये काँग्रेसचे देवराव मानदेवराव यांनी रिपब्लिकन पार्टीचे त्र्यंबक मारोती सावंत यांचा ५ हजार ७६९ मतांनी पराभव केला होता. १९६७ मध्ये नामदेवराव मारोतराव यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून रिपाइंचे डी.एल. मोरे यांचा ८ हजार २९५ मतांनी पराभव केला होता. १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे त्र्यंबकराव सावंत यांनी आरपीआयचे दौलतराव मोरे यांचा ६ हजार ३६६ मतांनी पराभव केला.

१९७८ मध्ये या मतदारसंघाची गणिते बदलली. यावर्षी शेकापकडून ज्ञानोबा हरि गायकवाड यांनी निवडणूक लढवत आरपीआयचे सटवाजी नांदापूरकर यांचा ३ हजार २९८ मतांनी पराभव केला. पुन्हा १९८० मध्ये शेकापकडून गायकवाड यांनी काँग्रेस आयचे विलास जंगले यांचा ३ हजार २३ मतांनी पराभव केला. १९८५ च्या निवडणुकीत पुन्हा शेकापचे ज्ञानोबा हरि गायकवाड यांनी काँग्रेसचे त्र्यंबकराव सावंत यांचा १९ हजार ६०२ मतांनी पराभव केला. १९९० मध्ये सर्वप्रथम मुंबईतील सर्वप्रथम सीताराम घनदाट यांनी गंगाखेड गाठून भाजपची उमेदवारी मिळविली; परंतु, त्यांचा शेकापचे आ.ज्ञानोबा गायकवाड यांनी तब्बल १२ हजार ८१७ मतांनी पराभव केला. त्यानंतर मात्र १९९५ मध्ये अपक्ष सीताराम घनदाट यांनी शेकापचे ज्ञानोबा गायकवाड यांचा फक्त ४७६ मतांनी  पराभव केला. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाचे उमेदवार साळवे यांनी १४ हजार ६६६ तर अपक्ष कांबळे यांनी ५ हजार ४६६ आणि काँग्रेसचे उमेदवार कांबळे यांनी ५ हजार १६६ मते मिळविली होती. मतातील विभाजनामुळे घनदाट यांना या निवडणुकीत विजय मिळविता आला.

१९९९ मध्ये पुन्हा अपक्ष घनदाट यांनी शेकापचे गायकवाड यांचाच ६ हजार ७९६ मतांनी पराभव केला. या निवडणुकीतही गायकवाड यांच्या पराभवाचे कारण मतविभाजनच ठरले. यावेळी भाजपा उमेदवाराने तब्बल १७ हजार ९९०, रिपाइं उमेदवाराने ९ हजार ५०९ तर भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराने २ हजार २२६ मते मिळविली होती. २००४ मात्र भाजपाचे विठ्ठल पुरभाजी गायकवाड यांनी अपक्ष सीताराम घनदाट यांचा ९ हजार ३०१ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर शेकापचे उमेदवार वाव्हळे हे होते. त्यांना २९ हजार ३९५ मते मिळाली. २००९ मध्ये हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सुटला. त्यानंतर पुन्हा अपक्ष उमेदवार घनदाट यांनी भाजपाचे उमेदवार डॉ.मधुसूदन केंद्रे यांचा १८ हजार ८८० मतांनी पराभव केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुरेश वरपूडकर हे ४८ हजार ७०३ मते मिळवित तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यावेळी ही निवडणूक चांगली गाजली होती.

आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांमुळे या वर्षी चर्चा वाढलीगंगाखेड विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात यावर्षी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात उतरत आहेत. त्यामध्ये कंत्राटदार, संस्थाचालक, बँकेचे अध्यक्ष आदींचा समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता या निवडणुकीतही मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. त्यामुळे निवडणूक विभाग आणि पोलीस यंत्रणेला सतर्क रहावे लागणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात याच मतदारसंघात तळ ठोकला होता. त्यामुळेच अनेक दिग्गजांचे मतदारांना पैसे वाटप करुन मते मिळविण्याचे मनसुबे धुळीस मिळाले होते. आताचे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर हे या मतदारसंघाच्या अनुषंगाने काय भूमिका घेतात, याबाबत संपूर्ण जिल्हावासीयांचे  लक्ष लागले आहे. 

पैसे वाटपाने गाजली २०१४ ची निवडणूकगंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात २०१४ ची निवडणूक सर्वाधिक गाजली ती  पैसे वाटपाने. या निवडणुकीत पैसे वाटप केल्या प्रकरणी अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट आणि रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी पैसेही पकडले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन केंद्रे यांनी रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांचा २ हजार २८९ मतांनी पराभव केला. अपक्ष सीताराम घनदाट हे ४७ हजार ७१४ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर तर शिवसेनेचे शिवाजी दळणर हे ४१ हजार ९१५ मते घेत चौथ्या आणि मनसेचे बालासाहेब देसाई हे १७ हजार ८१६ मते घेत पाचव्या क्रमांकावर राहिले. 

रासप निवडणुकीच्या रिंगणाबाहेर ?२०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून रत्नाकर गुट्टे यांनी दुसऱ्या क्रमांकाची ५५ हजार ९३७ मते मिळविली होती. आता शेतकरी कर्ज फसवणूक प्रकरणात ते कारागृहात आहेत. शिवसेना- भाजपाच्या राज्यस्तरीय युतीनुसार गंगाखेडची जागा शिवसेनेकडे गेली आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत या मतदारसंघातून रासप रिंगणाबाहेर राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीvidhan sabhaविधानसभा