शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Ashadhi Ekadashi : म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला गेले नाहीत; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 17:17 IST

महाराष्ट्राचा पैसा वापरून स्वतंत्र विदर्भाचा घाट घालण्याचा भाजपाचा प्रयत्न

परभणी : मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची शासकीय पूजा न करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत टीका केली.  ते म्हणाले की, थापा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांचंच दर्शन नको, असे संकेत विठ्ठलानेच दिले आहेत. पक्ष बांधणीच्या उद्देशाने राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी परभणी येथे पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. उर्वरित महाराष्ट्रातील रिसोर्सेस आणि पैसा वापरून स्वतंत्र विदर्भ करण्याचा घाट भाजपा सरकारने घातला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला.

राज ठाकरे म्हणाले, राज्यात सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न असताना विकास कामे मात्र केवळ नागपूरला केंद्रस्थानी धरूनच केले जात आहेत. नागपूरच्या विकासाला आमचा विरोध नाही़ परंतु, इतर विभागांना दुर्लक्षत ठेवले जात आहेत. मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे, मुंबई-नागपूर रेल्वे मार्ग या सर्वांची गरज काय? असा सवाल करीत महाराष्ट्राचा पैसा वापरून स्वतंत्र विदर्भ राज्याची आखणी केली जात असल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि भाजपाचे सरकार हे माझ्या आतापर्यंतच्या पाहण्यातील सर्वात खोटारडे सरकार असल्याचाही आरोप त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले, केवळ युवकांना झुलवत ठेवण्याचे काम केले जात आहे, सत्य काय आहे हे त्यांनी सांगितले पाहिजे़ ही एक राजकीय खेळी असल्याचेही ठाकरे म्हणाले. मराठवाड्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. मराठवाड्याला राज्यात प्रतिनिधीत्व मिळाले नाही असे नाही. परंतु, अनेक मुख्यमंत्री मराठवाड्यातून झाले असताना सुद्धा हा विभाग विकासापासून दूर असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा