शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज वाढत असल्याने महागाईचा भडका उडाला ...

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज वाढत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. विशेष म्हणजे, पेट्रोलसह डिझेलचे दरही आता शंभरीकडे पोहोचू लागले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. डिझेलच्या किमतीही वाढत असल्याने मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. परिणामी, बाहेरगावाहून आवक होणाऱ्या भाजीपाल्यासह किराणा मालाच्या किमतीही तेवढ्याच वाढल्या आहेत. इंधनाच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडून गेले आहे. नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत.

परभणी पेट्रोल १०७ रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे तर डिझेलही ९७.९५ रुपये प्रति लिटर या दराने विक्री होत आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच जिल्ह्यातील नागरिक आर्थिक संकटात असताना त्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्याने आर्थिक अडचणीही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या वाढलेल्या महागाईचा सर्वसामान्य नागरिकांकडून निषेध केला जात आहे.

डाळी, खाद्यतेल महागले

मागील वर्षीच्या तुलनेत डाळ आणि खाद्यतेलाचे दर १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. मध्यंतरी खाद्यतेल १६५ रुपये लिटरपर्यंत पोहोचले होते. ही दरवाढ कमी झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत १५ रुपयांनी खाद्यतेल महागले आहे. सोयाबीन तेल मागील वर्षी १०० रुपये लिटर या दराने विक्री झाले. यावर्षी सोयाबीन तेलाचे दर १३५ रुपये लिटर एवढे आहेत. त्याचप्रमाणे मागील वर्षी ८० रुपये किलो या दराने विक्री होणारी तूर डाळ सध्या ९५ रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. चणा डाळीचे दर मात्र स्थिर आहेत.

गवार ८० रुपये किलो

जिल्ह्यात भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. गवारीच्या शेंगा ८० रुपये किलो या दराने विक्री होत आहेत. त्याचप्रमाणे पानकोबी, फुलकोबी, वांगे ६० रुपये किलो या दराने विक्री होत आहेत. बटाट्याचे दर हे ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. सिमला मिरची, कारले, दोडके, मेथी, पालक या भाज्यांचे दरही कडाडले आहेत.

इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा फटका किराणा बाजारभावावरही झाला आहे. विशेष म्हणजे त्यात खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तेलाबरोबरच तूर डाळीच्या किमतीही वाढलेल्या आहेत. मात्र साखर, चणा डाळीच्या किमती स्थिर आहेत. एकंदर या दरवाढीचा फटका व्यापाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.

-विष्णू वट्टमवार, व्यापारी.

बिटावर भाजी महाग मिळत असल्याने आम्हाला त्याच दराने भाजी विक्री करावी लागते. मागील सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत. ४० ते ५० रुपये किलो विक्री होणाऱ्या भाज्या ६० ते ८० रुपये किलो या दराने विक्री कराव्या लागत आहेत. त्यामुळे व्यवसायात अधिक रक्कम गुंतवावी लागत असून, त्याचा फटका बसत आहे.

-रमेश रणेर, भाजी विक्रेता

मागच्या काही महिन्यांपासून किराणा मालावरील खर्च वाढला आहे. महिन्याकाठी किराणा साहित्यासाठी राखून ठेवलेल्या रकमेत महिनाभराचा किरणा येत नाही. त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. त्यातच तेल, डाळींच्या किमती वाढल्याने महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

-योगिता हलगरकर, गृहिणी

भाजीपाल्याबरोबरच किराणा बाजारपेठेत वाढलेल्या महागाईमुळे आम्ही त्रस्त आहोत. महिन्याकाठी ठराविक रकमेचे नियोजन केले जाते. मात्र, त्यात महिन्याचा किराणा आणि भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सहा महिन्यांपासून या किमती वाढतच चालल्याने महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.