शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

परभणी जिल्ह्यासाठी मिळणार जायकवाडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:48 IST

जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परभणी जिल्ह्याला सुरुवातीला जायकवाडी धरणातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. त्यानंतर जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात होती. यावर्षी परभणी जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाथरी मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ हे तिन्ही तालुके गंभीर दुष्काळ म्हणून शासनाने जाहीर केली आहेत. जायकवाडीच्या पाथरी येथील उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्याचा बराच भाग येतो. या भागात रबीची पेरणी झाली. या भागात पिण्याचे पाणी तसेच शेतकºयांच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता होती. जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यासाठी जलसंपदामंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र मागे दोन महिन्यापासून कालवा सल्लागार समितीची बैठकच झाली नसल्याने जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय रखडला होता. आ.मोहन फड यांनी शासनस्तरावर याबाबत लेखीपत्र देऊन मागणी केली होती. ८ जानेवारी रोजी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला आ.मोहन फड, माजीमंत्री राजेश टोपे, गेवराईचे आ.लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची उपस्थिती होती. २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आ.मोहन फड यांनी दिली. दरम्यान, पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने दुष्काळी भागात जायकवाडी धरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबत असल्याने ‘जायकवाडीच्या पाण्याची अनिश्चितता कायम’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते.दुष्काळी भागाला होणार फायदा४परभणी जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे साठे आटले आहेत. पाणीपातळी खालावल्याने या भागात जायकवाडीच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. पाणी सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याने या भागाला दिलासा मिळाला आहे.-आ.मोहन फड, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजन