शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

परभणी जिल्ह्यासाठी मिळणार जायकवाडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:48 IST

जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परभणी जिल्ह्याला सुरुवातीला जायकवाडी धरणातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. त्यानंतर जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात होती. यावर्षी परभणी जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाथरी मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ हे तिन्ही तालुके गंभीर दुष्काळ म्हणून शासनाने जाहीर केली आहेत. जायकवाडीच्या पाथरी येथील उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्याचा बराच भाग येतो. या भागात रबीची पेरणी झाली. या भागात पिण्याचे पाणी तसेच शेतकºयांच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता होती. जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यासाठी जलसंपदामंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र मागे दोन महिन्यापासून कालवा सल्लागार समितीची बैठकच झाली नसल्याने जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय रखडला होता. आ.मोहन फड यांनी शासनस्तरावर याबाबत लेखीपत्र देऊन मागणी केली होती. ८ जानेवारी रोजी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला आ.मोहन फड, माजीमंत्री राजेश टोपे, गेवराईचे आ.लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची उपस्थिती होती. २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आ.मोहन फड यांनी दिली. दरम्यान, पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने दुष्काळी भागात जायकवाडी धरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबत असल्याने ‘जायकवाडीच्या पाण्याची अनिश्चितता कायम’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते.दुष्काळी भागाला होणार फायदा४परभणी जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे साठे आटले आहेत. पाणीपातळी खालावल्याने या भागात जायकवाडीच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. पाणी सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याने या भागाला दिलासा मिळाला आहे.-आ.मोहन फड, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजन