शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यासाठी मिळणार जायकवाडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:48 IST

जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परभणी जिल्ह्याला सुरुवातीला जायकवाडी धरणातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. त्यानंतर जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात होती. यावर्षी परभणी जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाथरी मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ हे तिन्ही तालुके गंभीर दुष्काळ म्हणून शासनाने जाहीर केली आहेत. जायकवाडीच्या पाथरी येथील उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्याचा बराच भाग येतो. या भागात रबीची पेरणी झाली. या भागात पिण्याचे पाणी तसेच शेतकºयांच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता होती. जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यासाठी जलसंपदामंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र मागे दोन महिन्यापासून कालवा सल्लागार समितीची बैठकच झाली नसल्याने जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय रखडला होता. आ.मोहन फड यांनी शासनस्तरावर याबाबत लेखीपत्र देऊन मागणी केली होती. ८ जानेवारी रोजी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला आ.मोहन फड, माजीमंत्री राजेश टोपे, गेवराईचे आ.लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची उपस्थिती होती. २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आ.मोहन फड यांनी दिली. दरम्यान, पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने दुष्काळी भागात जायकवाडी धरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबत असल्याने ‘जायकवाडीच्या पाण्याची अनिश्चितता कायम’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते.दुष्काळी भागाला होणार फायदा४परभणी जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे साठे आटले आहेत. पाणीपातळी खालावल्याने या भागात जायकवाडीच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. पाणी सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याने या भागाला दिलासा मिळाला आहे.-आ.मोहन फड, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजन