शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात केवळ ६०० क्युसेसने जायकवाडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:54 IST

परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणी दाखल झाले नाही. मागणी १२०० क्युसेसची असताना केवळ ६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागात वेळेच्या आत पाणी सिंचन पूर्ण होण्यास अडचणी होणार आहेत. दरम्यान, जायकवाडी पाटबंधारे औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडे व यांनी मुख्य कालव्याला भेट देऊन पाणी कमी का येत आहे, याचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणी दाखल झाले नाही. मागणी १२०० क्युसेसची असताना केवळ ६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागात वेळेच्या आत पाणी सिंचन पूर्ण होण्यास अडचणी होणार आहेत. दरम्यान, जायकवाडी पाटबंधारे औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडे व यांनी मुख्य कालव्याला भेट देऊन पाणी कमी का येत आहे, याचा आढावा घेतला.परभणी जिल्ह्या यावर्षी गंभीर दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पावसाचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी राहिल्याने कोरडवाहू शेती पूर्णत: अडचणीत आली आहे. खरीप हंगामातील पिके जगविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागातून जायकवाडी धरणाचा डावा कालवा जातो. मुख्य कालवा पाथरी तालुक्यातील वरखेडपासून १२२ कि.मी. असा सुरू होतो. दुष्काळ परिस्थितीत पाथरीसह जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी मिळणे अपेक्षित आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये या भागात एक पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतर या भागातील शेतकºयांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. आ. मोहन फड यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर जानेवारी महिन्यात कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला होता. जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात २३ जानेवारीपासून पाणी सोडण्यात आले आहे.२६ जानेवारी पर्यंत २०० क्युसेसने पाणी पाथरी भागात दाखल झाले. मात्र या भागात १२०० क्युसेसने पाणी सोडण्याची मागणी या विभागाडून जलसंपदा विभाग औरंगाबाद यांच्याकडे करण्यात आली होती. मागील १५ दिवसांत केवळ ५०० ते ६०० क्युसेसने या भागात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत पाणी राहणार असल्याची माहिती आहे.३००० हेक्टर सिंचन४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर पाथरी उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्यात या पाणी पाळीत ३००० हजार हेक्टर सिंचन झाले आहे. अद्याप १५०० हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र पाणी कमी क्षमतेने येत असल्याने पुढील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अधिकाºयांनी केली पाहणी४जायकवाडी धरणातून जिल्ह्याला सोडण्यात आलेले पाणी अगदी कमी क्षमतेने येत असल्याने जायकवाडीचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडेव्ह आणि कार्यकारी अभियंता सलगरकर यांनी १८ फेब्रुवारी रोजी जायकवाडीच्या मुख्य कालवाच्या पाथरी उपविभागात कॅनालला भेट देऊन याबाबत आढावा घेतला़सध्या मुख्य कालव्यात पानी कमी आहे. २ दिवसात पाणी वाढणार आहे.-खारकर, उपअभियंता पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प