शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

परभणी जिल्ह्यात केवळ ६०० क्युसेसने जायकवाडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:54 IST

परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणी दाखल झाले नाही. मागणी १२०० क्युसेसची असताना केवळ ६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागात वेळेच्या आत पाणी सिंचन पूर्ण होण्यास अडचणी होणार आहेत. दरम्यान, जायकवाडी पाटबंधारे औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडे व यांनी मुख्य कालव्याला भेट देऊन पाणी कमी का येत आहे, याचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणी दाखल झाले नाही. मागणी १२०० क्युसेसची असताना केवळ ६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागात वेळेच्या आत पाणी सिंचन पूर्ण होण्यास अडचणी होणार आहेत. दरम्यान, जायकवाडी पाटबंधारे औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडे व यांनी मुख्य कालव्याला भेट देऊन पाणी कमी का येत आहे, याचा आढावा घेतला.परभणी जिल्ह्या यावर्षी गंभीर दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पावसाचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी राहिल्याने कोरडवाहू शेती पूर्णत: अडचणीत आली आहे. खरीप हंगामातील पिके जगविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागातून जायकवाडी धरणाचा डावा कालवा जातो. मुख्य कालवा पाथरी तालुक्यातील वरखेडपासून १२२ कि.मी. असा सुरू होतो. दुष्काळ परिस्थितीत पाथरीसह जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी मिळणे अपेक्षित आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये या भागात एक पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतर या भागातील शेतकºयांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. आ. मोहन फड यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर जानेवारी महिन्यात कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला होता. जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात २३ जानेवारीपासून पाणी सोडण्यात आले आहे.२६ जानेवारी पर्यंत २०० क्युसेसने पाणी पाथरी भागात दाखल झाले. मात्र या भागात १२०० क्युसेसने पाणी सोडण्याची मागणी या विभागाडून जलसंपदा विभाग औरंगाबाद यांच्याकडे करण्यात आली होती. मागील १५ दिवसांत केवळ ५०० ते ६०० क्युसेसने या भागात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत पाणी राहणार असल्याची माहिती आहे.३००० हेक्टर सिंचन४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर पाथरी उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्यात या पाणी पाळीत ३००० हजार हेक्टर सिंचन झाले आहे. अद्याप १५०० हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र पाणी कमी क्षमतेने येत असल्याने पुढील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अधिकाºयांनी केली पाहणी४जायकवाडी धरणातून जिल्ह्याला सोडण्यात आलेले पाणी अगदी कमी क्षमतेने येत असल्याने जायकवाडीचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडेव्ह आणि कार्यकारी अभियंता सलगरकर यांनी १८ फेब्रुवारी रोजी जायकवाडीच्या मुख्य कालवाच्या पाथरी उपविभागात कॅनालला भेट देऊन याबाबत आढावा घेतला़सध्या मुख्य कालव्यात पानी कमी आहे. २ दिवसात पाणी वाढणार आहे.-खारकर, उपअभियंता पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प