शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

परभणी जिल्ह्यात केवळ ६०० क्युसेसने जायकवाडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:54 IST

परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणी दाखल झाले नाही. मागणी १२०० क्युसेसची असताना केवळ ६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागात वेळेच्या आत पाणी सिंचन पूर्ण होण्यास अडचणी होणार आहेत. दरम्यान, जायकवाडी पाटबंधारे औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडे व यांनी मुख्य कालव्याला भेट देऊन पाणी कमी का येत आहे, याचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणी दाखल झाले नाही. मागणी १२०० क्युसेसची असताना केवळ ६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागात वेळेच्या आत पाणी सिंचन पूर्ण होण्यास अडचणी होणार आहेत. दरम्यान, जायकवाडी पाटबंधारे औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडे व यांनी मुख्य कालव्याला भेट देऊन पाणी कमी का येत आहे, याचा आढावा घेतला.परभणी जिल्ह्या यावर्षी गंभीर दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पावसाचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी राहिल्याने कोरडवाहू शेती पूर्णत: अडचणीत आली आहे. खरीप हंगामातील पिके जगविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागातून जायकवाडी धरणाचा डावा कालवा जातो. मुख्य कालवा पाथरी तालुक्यातील वरखेडपासून १२२ कि.मी. असा सुरू होतो. दुष्काळ परिस्थितीत पाथरीसह जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी मिळणे अपेक्षित आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये या भागात एक पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतर या भागातील शेतकºयांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. आ. मोहन फड यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर जानेवारी महिन्यात कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला होता. जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात २३ जानेवारीपासून पाणी सोडण्यात आले आहे.२६ जानेवारी पर्यंत २०० क्युसेसने पाणी पाथरी भागात दाखल झाले. मात्र या भागात १२०० क्युसेसने पाणी सोडण्याची मागणी या विभागाडून जलसंपदा विभाग औरंगाबाद यांच्याकडे करण्यात आली होती. मागील १५ दिवसांत केवळ ५०० ते ६०० क्युसेसने या भागात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत पाणी राहणार असल्याची माहिती आहे.३००० हेक्टर सिंचन४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर पाथरी उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्यात या पाणी पाळीत ३००० हजार हेक्टर सिंचन झाले आहे. अद्याप १५०० हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र पाणी कमी क्षमतेने येत असल्याने पुढील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अधिकाºयांनी केली पाहणी४जायकवाडी धरणातून जिल्ह्याला सोडण्यात आलेले पाणी अगदी कमी क्षमतेने येत असल्याने जायकवाडीचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडेव्ह आणि कार्यकारी अभियंता सलगरकर यांनी १८ फेब्रुवारी रोजी जायकवाडीच्या मुख्य कालवाच्या पाथरी उपविभागात कॅनालला भेट देऊन याबाबत आढावा घेतला़सध्या मुख्य कालव्यात पानी कमी आहे. २ दिवसात पाणी वाढणार आहे.-खारकर, उपअभियंता पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प