शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

मुळी बंधाऱ्यास दरवाजे बसविल्यास ११ गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST

परभणी : गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्यास दरवाजे बसविल्यास परिसरातील ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तसेच ...

परभणी : गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्यास दरवाजे बसविल्यास परिसरातील ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तसेच २ हजार हेक्टर जमिनीचे बारमाही सिंचन होईल. त्यामुळे या बंधाऱ्यास दरवाजे बसवावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्यात १०.३५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता; परंतु या बंधाऱ्यास बसविलेल्या स्वयंचलित दरवाजांपैकी ४ दरवाजे २०१२ मध्ये वाहून गेले. त्यानंतर खासगी एजन्सीमार्फत नवीन दरवाजे बसविण्यात आले. २०१६ मधील पुरामुळे बंधाऱ्याचे २० पैकी १६ दरवाजे वाहून गेले. त्यावेळेपासून या बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नाही. येथे दरवाजे बसविल्यास परिसरातील ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तसेच २ हजार हेक्टर जमिनीचे बारमाही सिंचन होईल. त्यामुळे हे काम खासगी एजन्सीऐवजी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकीद्वारा निर्मिती मंडळ पुणे यांच्या अधिपत्याखालील कार्यालयाच्यावतीने करण्यात यावे. आजपर्यंत जलसंपदाच्या यांत्रिकी विभागानेच जायकवाडी, विष्णुपुरी, माजलगाव, निम्न दुधना, इसापूर प्रकल्प, पैठण डावा, उजवा कालवा आदी मराठवाड्यातील अनेक मध्यम प्रकल्पाचे गेट बसविण्याचे चांगले काम केले आहे, असेही या निवेदनात प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने म्हटले आहे.