शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

परभणी: वाळूघाट लिलावाची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 12:49 AM

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असून, साधारणत: दोन महिन्यांमध्ये वाळू घाट खुले होतील, अशी आशा जिल्हावासियांना लागली आहे़तब्बल दीड वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळू चोरी वाढली आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत़ त्यामुळे लिलावाअभावी जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, वाळू घाटांच्या लिलावाची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे़दरम्यान, सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसानंतर सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने वाळू उपसा करणेही शक्य नव्हते़ मात्र आता काही वाळू घाटांमधून वाळू उपसा करणे शक्य झाल्याने जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाच्या वतीने ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार केला असून, हा आराखडा मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे़ खनिकर्म संचालनालयाची मंजुरी मिळाल्यानंतर वाळू घाटांचे लिलाव करण्यासाठी जनसुनावणी घेणे त्यानंतर राज्य समितीच्या बैठकीत या प्रक्रियेला मंजुरी घेणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया होणार आहे़ या सर्व प्रक्रियेला साधारणत: दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांना वाळू घाट खुले होण्यासाठी आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़ असे असले तरी प्रत्यक्षात या प्रक्रियेला सुरुवात झाल्यामुळे जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत़गोदावरी नदीवरील सर्वाधिक घाट४जिल्हा प्रशासनाने खाणकाम आराखडा तयार केलेल्या ३० घाटांमध्ये गोदावरी नदीवरील सर्वाधिक वाळू घाट आहेत़ या नदीवर १८, पूर्णा नदीवरील ७ आणि दूधना नदीवरील ५ वाळू घाटांचा समावेश आहे़४त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील सर्वाधिक ९ वाळू घाटांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ त्याखालोखाल परभणी तालुक्यातील ५, गंगाखेड तालुक्यातील ४, सेलू, पालम तालुक्यातील प्रत्येकी ३, सोनपेठ, मानवत आणि जिंतूर तालुक्यातील प्रत्येकी २ वाळू घाटांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत़जनसुनावणीसाठी एक महिन्याचा कालावधी४वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे़ शासनाच्या नियमानुसार भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाने मंजुरी दिल्यानंतर या प्रस्तावांची जन सुनावणी घेणे आवश्यक आहे़४या सुनावणीसाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित करून दिला आहे़ त्यामुळे जनसुनावणी वाळू घाटांच्या मंजुरीसाठीच तब्बल एक महिन्याचा कालावधी लागणार आहे़ त्यानंतर जनसुनावणीत मंजूर झालेल्या वाळू घाटांना स्टेट इन्व्हार्नमेंट असेसमेंट कमिटी (एसईएसी) आणि स्टेट इन्व्हार्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अ‍ॅथॉरिटी (एसईआयएए) या दोन समित्यांच्या मंजुरी घेणे आवश्यक आहे़४ही मंजुरी मिळाल्यानंतर ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार असून, या प्रक्रियेनंतर मंजूर झालेल्या वाळू घाटांची रक्कम जमा करून घेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे़ त्यामुळे किमान दोन महिने येथील नागरिकांना खुल्या वाळूसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे़या वाळू घाटांचे प्रस्ताव सादरजिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचे खाणकाम आराखडे तयार केले आहेत़ त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, धनगर टाकळी, पेनूर, कळगाव, धानोरा मोत्या, मुंबर, कानडखेड, पिंपळगाव सारंगी, पिपंळगाव बाळापूर, गंगाखेड तालुक्यातील पिंप्री झोला, महातपुरी, भांबरवाडी, आनंदवाडी, सोनपेठ तालुक्यातील लोहीग्राम, पोहंडूळ, परभणी तालुक्यातील काष्टगाव, जोड परळी, सावंगी खुर्द, नांदगाव खुर्द, पिंपळगाव टोंग, मानवत तालुक्यातील शेवडी जहांगीर, वांगी, सेलू तालुक्यातील खादगाव, मोरेगाव, काजळी रोहिणा, जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके, वझूर-२ आणि पालम तालुक्यातील राहटी, दुटका, धनेवाडी या वाळू घाटांचे खाणकाम आराखडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग