शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मानवत तालुक्यात जोरदार पाऊस, किन्होळा गावात बैलजोडी वाहून गेली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:49 IST

जवळपास महिनाभराच्या खंडानंतर बुधवारी (दि.१५) रात्री साडेबारा वाजता सुरु झालेल्या पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली.

मानवत (परभणी ) : जवळपास महिनाभराच्या खंडानंतर बुधवारी (दि.१५) रात्री साडेबारा वाजता सुरु झालेल्या पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली. या जोरदार पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. तर आज सकाळी किन्होळी गावातून गेलेल्या कॅनॉलमध्ये एक बैलगाडी बैलासह वाहून गेली. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला तर चालक बचावला आहे.  

तालुक्यातील केकर जवळा मंडळात ७९ मि. मी, मानवत मंडळात १६३ मि. मी, कोल्हा मंडळात ६३ मि. मी पाउस पडल्याची सरासरी  नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. 

संततधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्याप्रमाणावर पाणी आले आहे. किन्होळी गावातून गेलेल्या कॅनॉलला पाणी आले आहे. याच गावातील शेतकरी सर्जेराव कदम यांची बैलगाडी बैलासह कॅनॉलमध्ये वाहून गेली. यात दोन्ही बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. तसेच नागरजवळा पावसामुळे बापुराव शंकरराव कसारे, बाबासाहेब रामभाउ होगे, रमेश कल्याणराव होगे यांच्या घराच्या भिंती पडुन नुकसान झाले. शहरातही पावसाचा परिणाम दिसुन आला. काल पावसाने बाजार पेठेत शुकशुकाट होता. आज दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत  गर्दी होती. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती