शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

हृदयद्रावक ! घरच्या ओढीने मजूर महिलेने ३१० किमीचे अंतर चालत कापले, ५६ किमीवर घर असताना वाहनाने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 13:45 IST

मनमाडवरून परभणी तालुक्यातील दैठण्यातील घराकडे चालत निघाली होती महिला

मानवत (जि़परभणी) : घराच्या ओढीने नाशिक जिल्ह्यातील जातपाडा येथून पायी निघालेल्या महिलेला ३१० कि.मी. अंतराचा प्रवास केल्यानंतर मानवतमध्ये एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत ही महिला गावानजीक जागीच मरण पावल्याची दुर्दैवी घटना ५ मे रोजी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास घडली़ 

परभणी तालुक्यातील दैठणा हे गाव सुनीता कतार यांचे माहेर आहे़ काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते़ मात्र पतीच्या निधनानंतर कामधंद्याच्या शोधात त्या अहमदनगर येथे स्थायिक झाल्या़ काही दिवसांपूर्वी त्या नाशिक जिल्ह्यातील जातपाडा येथे त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या़ मात्र लॉकडाऊनमुळे त्या अडकून पडल्या़ दीड महिन्यांपासून बहिणीच्या घरी राहत असलेल्या सुनीता कतार यांनी दैठणा येथे आईच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला़ मात्र प्रवासासाठी वाहने बंद असल्याने त्या ३ मे रोजी पायी निघाल्या़ 

काही वाहनचालकांनी त्यांना थोड्या थोड्या अंतरापर्यंत मदत केली़ मात्र उर्वरित प्रवास त्यांनी पायीच केला़ सुमारे ३१० कि.मी. अंतराचा प्रवास करून ५ मे रोजी पहाटे त्या या मानवत शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील केकेएम महाविद्यालयाच्या समोरुन जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली़ त्यात त्यांचा मृत्यू झाला़ अपघातस्थळी त्यांच्याजवळील बॅग आढळली़  या बॅगेतील आधार कार्डावरून या महिलेची माहिती समोर आली़ पोलिसांनी या अपघाताची माहिती सुनीता कतार यांच्या आई  निलाबाई कुºहाडे आणि मामा मधुकर कच्छवे यांना दिली़ त्यानंतर दोघेही मानवत येथे दाखल झाले़ शवविच्छेदनानंतर मृतदेह आई आणि मामाच्या ताब्यात देण्यात आला़ मधुकर कच्छवे यांच्या फिर्यादीवरुन मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार अधिक तपास करीत आहेत़ 

अवघ्या ५० कि. मी. अंतरावर आले होते घरनाशिक जिल्ह्यातील जातपाडा येथील ३१० किमी अंतराचा प्रवास करून मानवतजवळ आल्यानंतर सुनीता कतार यांना अज्ञात वाहनाने धडक दिली़ त्यांचे घर दैठणा येथे असून, घटनास्थळापासून ५० कि.मी. अंतरापर्यंतच त्यांना प्रवास करायचा होता; परंतु, काळाने त्यांच्यावर घाला घातला़ घर जवळ करण्यापूर्वीच सुनीता कतार यांनी मृत्यूला जवळ केले़ त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहायक निरीक्षक भारत जाधव, पोलीस नाईक मुंजाभाऊ पायघर, बेंद्रे, बळीराम थोरे, चालक खरात आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ या घटनेमुळे मजुरांच्या परतीच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणीAccidentअपघात