शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

परभणीत कोरोनाचा कहर : तपासण्या कमी; मृत्यूदर सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 7:13 PM

चाचण्यांमध्ये मराठवाड्यात परभणी जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे़ 

ठळक मुद्देआतापर्यंत जिल्ह्यात फक्त १८ हजार ५४० जणांच्या तपासण्यापरभणी जिल्ह्याचा मृत्यूदर ४़४५ टक्के

परभणी : सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना या आजाराचा फैलाव रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोरोना संशयितांच्या तपासण्या करण्याचे परभणी जिल्ह्याचे प्रमाण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत सर्वात कमी आहे़ तर कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा दर मात्र सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे़ 

जिल्हा प्रशासनाने ३ सप्टेंबर रोजी शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात फक्त १८ हजार ५४० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत़ त्यातील २ हजार ७६७ जण कोरोनाबाधित आढळल्याचे अहवालात नमूद केले आहे़ प्रत्यक्षात या दिवसापर्यंत जिल्ह्यात ३ हजार २२३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत़ चाचण्यांमध्ये मराठवाड्यात जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे़ 

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८९ हजार ८२१ (२४ हजार ३२२ कोरोनाबाधित रुग्ण) तर जालना जिल्ह्यात ३६ हजार ५४ (५ हजार ८८ कोरोनाबाधित रुग्ण), हिंगोली २० हजार ६२६ (१ हजार ५४५), नांदेडमध्ये ४९ हजार ९३६ (७ हजार २०७), बीडमध्ये ६४ हजार ७९८ (४ हजार ८००), लातूरमध्ये ५५ हजार ८८८( ८ हजार ७०२) तर उस्मानाबादमध्ये ३९ हजार ४६० (६ हजार १०७ कोरोनाबाधित रुग्ण) संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत़ 

परभणी जिल्ह्याचा मृत्यूदर ४़४५ टक्केरूग्णांच्या मृत्यूदरामध्ये मात्र परभणी जिल्हा मराठवाड्यात टॉपवर आहे़ ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात १२३ जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्रशासनाने वरिष्ठांना सादर केला़ त्याचे प्रमाण ४़४५ टक्के आहे़ मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याचा रुग्ण मृत्यूचा दर २़९४ टक्के, नांदेड ३़४९ टक्के, लातूर ३़३१ टक्के, जालना २़९३ टक्के, बीड २़७१ टक्के, हिंगोली १़२९ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २़७० टक्के मृत्यूदर आहे़ परभणीतील अधिकाऱ्यांसाठी ही चिंतनीय बाब आहे़ कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्यातही परभणी जिल्हा मागेच आहे़ जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ३९़२१ टक्के आहे़ मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ८६़२८ टक्के रिकव्हरी रेट हिंगोली जिल्ह्याचा आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी