शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

'तीन मुली झाल्या, तुला मुलगा का होत नाही'; छळाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 19:31 IST

या प्रकरणी सासरच्या तिघांविरुध्द पूर्णा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- गजानन नाईकवाडे ताडकळस (जि.परभणी) : तीन मुली झाल्या, तुला मुलगा का होत नाही या कारणाने सासरच्या मंडळीकडून सतत होत असलेल्या जाचाला कंटाळून एका तेहतीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना पूर्णा तालुक्यातील आव्हई येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली.रेखा गोविंद सोनवणे असे मयत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, रेखा आबासाहेब रासवे (रा.कोेक, ता.जिंतूर) यांचा विवाह सन २०१२ मध्ये पूर्णा तालुक्यातील आव्हई येथील गोविंद सोनवणे यांच्या सोबत झाला होता. लग्नानंतर रेखा यांना तीन मुली झाल्या. परंतू, मुलगा झाला नाही. त्यामुळे तुला मुलगा होत नाही, मुलीच होतात असे म्हणून सासरची मंडळी सारखा तगादा लावत जाच करत होती. या जाचास कंटाळून तीन एप्रिलला सकाळी रेखा यांनी शेताजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती कळताच पोलीस पाटील व ग्रामस्थांनी पूर्णा पोलीस ठाण्याला कळविली. त्यानंतर पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सपोनि.गंगाधर गायकवाड, पोपलवार, रमेश मुजमुले, श्याम काळे, महिला उपनिरीक्षक राखोंडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदरिल मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा केला. याप्रकरणी मयत विवाहिता रेखा यांचा भाऊ अमोल रासवे याच्या फिर्यादीवरुन किशन सोनवणे, गोविंद सोनवणे, कमलबाई सोनवणे या तिघांविरुध्द पूर्णा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी पतीस अटकघटनेनंतर आरोपी असलेल्या मयत विवाहितेच्या पतीस अटक करण्यात आली आहे. त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.गंगाधर गायकवाड हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीDeathमृत्यू