शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मध्यम प्रकल्पातील निम्मा पाणीसाठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

परभणी : मागच्या पाच महिन्यात मध्यम प्रकल्पातील पन्नास टक्के पाणीसाठा उपसा करण्यात आला असून सध्या केवळ ५० टक्केच पाणी ...

परभणी : मागच्या पाच महिन्यात मध्यम प्रकल्पातील पन्नास टक्के पाणीसाठा उपसा करण्यात आला असून सध्या केवळ ५० टक्केच पाणी या प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिले आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन करताना या पाण्याचा काटेकोर वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात तर अतिवृष्टी झाली होती. या पावसामुळे जिल्ह्यातील लघु तलाव, मध्यम प्रकल्प तुडुंब भरले होते. गंगाखेड आणि जिंतूर या तालुक्यांमध्ये प्रकल्पांची संख्या अधिक आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ३४.०८ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. या प्रकल्पात सध्या २१.३०८ दलघमी पाणीसाठा उपलब्‍ध असून, त्यात १४.३६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्याची टक्केवारी ५३ टक्के एवढी आहे. तर जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पमध्ये २८.८२० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता असताना प्रत्यक्षात १५.८३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये ११.९१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. दोन प्रकल्पात मिळून २७.२७ दलघमी पाणी उपलब्ध असून, त्याची टक्केवारी केवळ ५० टक्के एवढी आहे.

उन्हाळ्याला आता प्रारंभ झाला असून, ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. त्यामुळे सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मध्यम प्रकल्पातील ५० टक्के पाण्याचे नियोजन करुन ते काटेकोरपणे वापरले तर ते संपूर्ण उन्हाळाभर पुरू शकेल. त्यामुळे प्रशासनाला आता पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बंधाऱ्यातही पाणीसाठा आटला

जिल्ह्यात गोदावरी नदीवर चार ठिकाणी बंधारे उभारण्यात आले आहेत; परंतु या बंधाऱ्यात ही पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नाही. पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन बंधाऱ्यांचा अपवाद वगळता इतर दोन बंधाऱ्यांमध्ये पाणी नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याला गेट नसल्याने पाणीसाठा झाला नाही तर पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी नांदेडसाठी आरक्षित करण्यात आल्याने हे पाणीही मागील महिन्यांमध्ये सोडून दिले आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा शिल्लक नसल्याने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन नियोजन करावी लागणार आहे.