शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:26 IST

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन दिल्याने कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त

परभणी : मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी शेतकऱ्यांना खोटी कर्जमाफीची आश्वासने दिली. त्यामुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. फडणवीस सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील शेतकरी सचिन जाधव व त्यांच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 'शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा' काढण्यात आली. ही पदयात्रा बुधवारी माळसोन्ना येथून सुरू होऊन १ मे रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचली. यावेळी सचिन जाधव यांच्या दोन्ही मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राजू शेट्टी यांनी महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा लेखाजोखा सरकारने सादर करावा. त्यातून त्यांच्या अपयशाचा आरसा दिसून येईल, असे त्यांंनी म्हटले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. देशात ६.५० लाख हेक्टर व राज्यात ३.५० लाख हेक्टर शेती क्षेत्र कमी झाले आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवली जाणारी आयात-निर्यात धोरणं, सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, पिकविमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले ‘संपूर्ण कर्जमुक्ती’चे आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या पदयात्रेत युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रकाश पोपळे, अजित पोवार, सचिन शिंदे, कृष्णा साबळे, माऊली मुळे, डॉ. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीparabhaniपरभणीfarmer suicideशेतकरी आत्महत्या