शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:26 IST

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन दिल्याने कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त

परभणी : मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी शेतकऱ्यांना खोटी कर्जमाफीची आश्वासने दिली. त्यामुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. फडणवीस सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील शेतकरी सचिन जाधव व त्यांच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 'शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा' काढण्यात आली. ही पदयात्रा बुधवारी माळसोन्ना येथून सुरू होऊन १ मे रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचली. यावेळी सचिन जाधव यांच्या दोन्ही मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राजू शेट्टी यांनी महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा लेखाजोखा सरकारने सादर करावा. त्यातून त्यांच्या अपयशाचा आरसा दिसून येईल, असे त्यांंनी म्हटले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. देशात ६.५० लाख हेक्टर व राज्यात ३.५० लाख हेक्टर शेती क्षेत्र कमी झाले आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवली जाणारी आयात-निर्यात धोरणं, सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, पिकविमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले ‘संपूर्ण कर्जमुक्ती’चे आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या पदयात्रेत युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रकाश पोपळे, अजित पोवार, सचिन शिंदे, कृष्णा साबळे, माऊली मुळे, डॉ. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीparabhaniपरभणीfarmer suicideशेतकरी आत्महत्या