शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
3
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
4
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
5
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
6
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
7
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
8
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
9
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
10
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
11
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
12
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
13
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
14
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
15
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
16
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
17
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
18
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
19
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
20
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:26 IST

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन दिल्याने कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त

परभणी : मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी शेतकऱ्यांना खोटी कर्जमाफीची आश्वासने दिली. त्यामुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. फडणवीस सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील शेतकरी सचिन जाधव व त्यांच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 'शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा' काढण्यात आली. ही पदयात्रा बुधवारी माळसोन्ना येथून सुरू होऊन १ मे रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचली. यावेळी सचिन जाधव यांच्या दोन्ही मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राजू शेट्टी यांनी महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा लेखाजोखा सरकारने सादर करावा. त्यातून त्यांच्या अपयशाचा आरसा दिसून येईल, असे त्यांंनी म्हटले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. देशात ६.५० लाख हेक्टर व राज्यात ३.५० लाख हेक्टर शेती क्षेत्र कमी झाले आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवली जाणारी आयात-निर्यात धोरणं, सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, पिकविमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले ‘संपूर्ण कर्जमुक्ती’चे आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या पदयात्रेत युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रकाश पोपळे, अजित पोवार, सचिन शिंदे, कृष्णा साबळे, माऊली मुळे, डॉ. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीparabhaniपरभणीfarmer suicideशेतकरी आत्महत्या