शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:26 IST

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन दिल्याने कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त

परभणी : मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी शेतकऱ्यांना खोटी कर्जमाफीची आश्वासने दिली. त्यामुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. फडणवीस सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील शेतकरी सचिन जाधव व त्यांच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 'शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा' काढण्यात आली. ही पदयात्रा बुधवारी माळसोन्ना येथून सुरू होऊन १ मे रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचली. यावेळी सचिन जाधव यांच्या दोन्ही मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राजू शेट्टी यांनी महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा लेखाजोखा सरकारने सादर करावा. त्यातून त्यांच्या अपयशाचा आरसा दिसून येईल, असे त्यांंनी म्हटले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. देशात ६.५० लाख हेक्टर व राज्यात ३.५० लाख हेक्टर शेती क्षेत्र कमी झाले आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवली जाणारी आयात-निर्यात धोरणं, सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, पिकविमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले ‘संपूर्ण कर्जमुक्ती’चे आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या पदयात्रेत युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रकाश पोपळे, अजित पोवार, सचिन शिंदे, कृष्णा साबळे, माऊली मुळे, डॉ. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीparabhaniपरभणीfarmer suicideशेतकरी आत्महत्या