शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

गावाबाहेर जाताय.... कुलूपबंद घर सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:19 AM

परभणी : मागच्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गावाबाहेर जाण्यापूर्वी नागरिकांना कुलूपबंद असलेले ...

परभणी : मागच्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गावाबाहेर जाण्यापूर्वी नागरिकांना कुलूपबंद असलेले घर सांभाळण्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले, जिल्ह्यातील आर्थिक उलाढालही मंदावली आहे. आता कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी, मागच्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही दररोज चोरीच्या एक-दोन घटना घडतच आहेत. त्यामुळे घराला कुलूप लावून बाहेर जायचे म्हटले तरी, नागरिकांना स्वत:च्या घराची काळजी घ्यावी लागणार आहे.

२०० हून अधिक घरफोड्या

जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. शहरातील कुलूपबंद घरे फोडण्याचे प्रकार होत आहेत. मागील महिन्यात तर शहरातील त्रिमूर्तीनगर, कारेगाव रोड या भागात घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे जेरबंद झाले आहेत.

अनलॉकनंतर वाढल्या चोऱ्या

अनलॉक झाल्यानंतर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनलॉक प्रक्रियेमुळे अनेकांनी प्रवासाला प्रारंभ केला. त्यामुळे कुलूपबंद असलेली घरे फोडण्याचे प्रमाण वाढले आहे.

चोरटे पकडले; समस्या कायम

पोलिसांनी घरफोड्यांचा तपास करीत असताना दोन अट्टल चोरटे काही दिवसांपूर्वी जेरबंद केले आहेत. या चोरट्यांनी पालम, गंगाखेड या भागात चोरी केल्याची कबुलीही दिली आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी केलेले २३ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. मात्र तरीही जिल्ह्यात इतर भागात चोरीच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.