शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकऱ्यांना दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या; छगन भूजबळ यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:41 IST

संपूर्ण आयुष्य कुटुंबासह मातीत राबराबून खर्ची घालणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या

परभणी : पुरोहितांना एकाच मोर्चात दरमाह ५ हजार रुपये मानधन देणार असाल तर संपूर्ण आयुष्य कुटुंबासह शेतीमध्ये राबणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी येथे झालेल्या बहुजन जागृती समता मेळाव्यात बोलताना केली.

परभणी येथील डीएसएम कॉलेजच्या मैदानावर अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने बहुजन जागृती समता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूजबळ बोलत होते. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी ५४ मोर्चे काढावे लागले. तेव्हा कुठे आरक्षण मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० टक्के आरक्षण सवर्ण समाजातील गरिबांना जाहीर केले आहे, त्यांचे कधी मोर्चे निघाले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईतही पुरोहितांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनीच त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याचे सांगितले होते. त्यात पुरोहितांना दरमाह ५ हजार रुपये मानधन देण्यात देणार असल्याच्या मागणीचा समावेश असल्याचे समजते. पौरोहित्य हा काही नियमित व्यवसाय नाही तो काही कालावधीसाठी करण्यात येणारा जोडधंदा आहे. त्यामुळे त्यांना दरमाह ५ हजार रुपये मानधन देणार असाल तर संपूर्ण आयुष्य कुटुंबासह मातीत राबराबून खर्ची घालणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या, त्यांना पैसे देता अन्  बाकीच्यांना नाहीत म्हणून सांगता, असे कसे चालेल, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांची तर व्यासपीठावर आ.विजय भांबळे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, माजी खा. गणेश दुधगावकर, आ.रामराव वडकुते, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलताई राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, महापौर मीनाताई वरपूडकर, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नंदाताई राठोड, मीनाताई राऊत आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले यांनी केले.

मनुस्मृतीचे केले दहनयावेळी छगन भूजबळ यांच्या हस्ते मनुस्मृतीच्या पुस्तिकेचे कार्यक्रमाच्या प्रारंभी दहन करण्यात आले. महिला, मुली, बहुजनांना शिक्षण घेऊ देत नाही ती मनुस्मृती काय कामाची म्हणूनच बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आजही मनुस्मृतीच्याच दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणूनच या मनुस्मृतीचे आम्ही दहन केले, असे यावेळी बोलताना छगन भूजबळ म्हणाले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार