शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शेतकऱ्यांना दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या; छगन भूजबळ यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:41 IST

संपूर्ण आयुष्य कुटुंबासह मातीत राबराबून खर्ची घालणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या

परभणी : पुरोहितांना एकाच मोर्चात दरमाह ५ हजार रुपये मानधन देणार असाल तर संपूर्ण आयुष्य कुटुंबासह शेतीमध्ये राबणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी येथे झालेल्या बहुजन जागृती समता मेळाव्यात बोलताना केली.

परभणी येथील डीएसएम कॉलेजच्या मैदानावर अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने बहुजन जागृती समता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूजबळ बोलत होते. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी ५४ मोर्चे काढावे लागले. तेव्हा कुठे आरक्षण मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० टक्के आरक्षण सवर्ण समाजातील गरिबांना जाहीर केले आहे, त्यांचे कधी मोर्चे निघाले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईतही पुरोहितांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनीच त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याचे सांगितले होते. त्यात पुरोहितांना दरमाह ५ हजार रुपये मानधन देण्यात देणार असल्याच्या मागणीचा समावेश असल्याचे समजते. पौरोहित्य हा काही नियमित व्यवसाय नाही तो काही कालावधीसाठी करण्यात येणारा जोडधंदा आहे. त्यामुळे त्यांना दरमाह ५ हजार रुपये मानधन देणार असाल तर संपूर्ण आयुष्य कुटुंबासह मातीत राबराबून खर्ची घालणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या, त्यांना पैसे देता अन्  बाकीच्यांना नाहीत म्हणून सांगता, असे कसे चालेल, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांची तर व्यासपीठावर आ.विजय भांबळे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, माजी खा. गणेश दुधगावकर, आ.रामराव वडकुते, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलताई राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, महापौर मीनाताई वरपूडकर, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नंदाताई राठोड, मीनाताई राऊत आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले यांनी केले.

मनुस्मृतीचे केले दहनयावेळी छगन भूजबळ यांच्या हस्ते मनुस्मृतीच्या पुस्तिकेचे कार्यक्रमाच्या प्रारंभी दहन करण्यात आले. महिला, मुली, बहुजनांना शिक्षण घेऊ देत नाही ती मनुस्मृती काय कामाची म्हणूनच बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आजही मनुस्मृतीच्याच दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणूनच या मनुस्मृतीचे आम्ही दहन केले, असे यावेळी बोलताना छगन भूजबळ म्हणाले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार