शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या; छगन भूजबळ यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:41 IST

संपूर्ण आयुष्य कुटुंबासह मातीत राबराबून खर्ची घालणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या

परभणी : पुरोहितांना एकाच मोर्चात दरमाह ५ हजार रुपये मानधन देणार असाल तर संपूर्ण आयुष्य कुटुंबासह शेतीमध्ये राबणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी येथे झालेल्या बहुजन जागृती समता मेळाव्यात बोलताना केली.

परभणी येथील डीएसएम कॉलेजच्या मैदानावर अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने बहुजन जागृती समता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूजबळ बोलत होते. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी ५४ मोर्चे काढावे लागले. तेव्हा कुठे आरक्षण मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० टक्के आरक्षण सवर्ण समाजातील गरिबांना जाहीर केले आहे, त्यांचे कधी मोर्चे निघाले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईतही पुरोहितांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनीच त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याचे सांगितले होते. त्यात पुरोहितांना दरमाह ५ हजार रुपये मानधन देण्यात देणार असल्याच्या मागणीचा समावेश असल्याचे समजते. पौरोहित्य हा काही नियमित व्यवसाय नाही तो काही कालावधीसाठी करण्यात येणारा जोडधंदा आहे. त्यामुळे त्यांना दरमाह ५ हजार रुपये मानधन देणार असाल तर संपूर्ण आयुष्य कुटुंबासह मातीत राबराबून खर्ची घालणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या, त्यांना पैसे देता अन्  बाकीच्यांना नाहीत म्हणून सांगता, असे कसे चालेल, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांची तर व्यासपीठावर आ.विजय भांबळे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, माजी खा. गणेश दुधगावकर, आ.रामराव वडकुते, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलताई राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, महापौर मीनाताई वरपूडकर, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नंदाताई राठोड, मीनाताई राऊत आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले यांनी केले.

मनुस्मृतीचे केले दहनयावेळी छगन भूजबळ यांच्या हस्ते मनुस्मृतीच्या पुस्तिकेचे कार्यक्रमाच्या प्रारंभी दहन करण्यात आले. महिला, मुली, बहुजनांना शिक्षण घेऊ देत नाही ती मनुस्मृती काय कामाची म्हणूनच बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आजही मनुस्मृतीच्याच दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणूनच या मनुस्मृतीचे आम्ही दहन केले, असे यावेळी बोलताना छगन भूजबळ म्हणाले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार