शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शॉर्टसर्किटने चार दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST

परभणी: तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे मंगळवारी रात्री १:३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने चार दुकाने जळून खाक झाली आहेत. या ...

परभणी: तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे मंगळवारी रात्री १:३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने चार दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेत ८५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टाकळी कुंभकर्ण येथे गुलाबराव रमाकांतराव सामाले यांची बसस्थानक परिसरात जागा आहे. या जागेत सुलोचना गुलाबराव सामाले यांच्यासह गोविंद बोंबले यांचे शिलाई मशीन, कल्याण दत्तराव सामाले यांचे रुद्रा ट्रेडिंग कंपनी व भारत बोंबले यांचे ठिबक, तुषार व विद्युत मोटारचे दुकान आहे. या दुकान मालकांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी व्यवसाय करून रात्रीच्या वेळी दुकान बंद करून घरी गेले होते. मात्र मंगळवारी रात्री १:३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन या चारही दुकानांना आग लागली. रात्रीची वेळ असल्याने आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले नाही. मात्र या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत या आगीत चारही दुकाने जळून खाक झाली. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दुकान मालकांनी या घटनेची माहिती वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता यांना दिली. त्यानंतर सहाय्यक अभियंता रवी नितनवरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आगीत जळून खाक झालेल्या चारही दुकानांचा पंचनामा केला. यामध्ये कल्याण दत्तराव सामाले यांच्या रुद्रा ट्रेडिंग कंपनी मधील ३३ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा भुसार माल जळून खाक झाल्याचे या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोविंद बोंबले यांचे शिलाई मशीन दुकान जळून खाक झाले. यामध्ये पाच लाखांचे तर भारत गंगाधरराव बोंबले यांचे ठिबक तुषार व विद्युत मोटारीचे साहित्य जळून ४० लाख नगदी तर रोख २ लाख रुपये असा एकूण ४२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर जागा मालक सुलोचना गुलाबराव सामाले यांचे ४ लाख रुपयांचे नुकसान या घटनेत झाले आहे. त्यामुळे या चारही व्यावसायिकांचे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाई देण्याची मागणी

परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे या आधीही महानगरपालिकेची पाइपलाइन फुटून तीन ते चार व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची महानगरपालिकेच्या वतीने तोडकी मदत व्यावसायिकांना देण्यात आली होती. त्यातच आता मंगळवारी शॉर्टसर्किट होऊन चार दुकाने जळून खाक झाले आहेत. यामध्ये ८५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. परिणामी या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या नुकसानग्रस्त व्यावसायिकांना मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.