शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

परभणी जिल्ह्यात पाच गावे अंधारात : कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:31 AM

तालुक्यातील कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून पाच गावे अंधारात असून, अनेक गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ दरम्यान, श्री विसर्जनही ग्रामस्थांना अंधारातच करावे लागले़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून पाच गावे अंधारात असून, अनेक गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ दरम्यान, श्री विसर्जनही ग्रामस्थांना अंधारातच करावे लागले़कान्हाड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून कान्हड, सिमणगाव, गव्हा, कुपटा, पारडी, कौसडी, मारवाडी, तांदूळवाडी, आडगाव, गुळखंड व हट्टा या गावांना वीज पुरवठा करण्यात येतो़ २२ सप्टेंबर रोजी कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेदं्रातील रोहित्रामध्ये मोठा बिघाड झाल्याने वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांतून वीज गायब झाली आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांना कृषीपंपाद्वारे पाणी देण्यात येत आहे़ त्यामुळे कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार आल्याने वारंवार बिघाड होत आहे़ त्यानंतर अनेक गावांना अंधारात रात्र काढावी लागत आहे़ त्यामुळे महावितरणकडून बोरी येथील ३३ केव्ही उपकेंंद्रातून वीज पुरवठा करण्याच्या हालचाली करण्यात आल्या़ त्यानंतर बोरी येथून कान्हड, सिमणगाव, गव्हा, पार्डी, कौसडी, मारवाडी इ. गावांना वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे़ मात्र कुपटा, तांदूळवाडी, आडगाव, गुळखंड व हट्टा या पाच गावांचा वीज पुरवठा सोमवारी दुपारपर्यंत सुरळीत झाला नव्हता़ रोहित्रात बिघाड झाल्याने अनेक गावांची बत्ती गायब झाली़ त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ पिण्याचे पाणी, दळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ तसेच पाणीपुरवठा योजना विजेअभावी ठप्प पडली आहे़ वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत़ कृषीपंपांचा भार वाढत असल्याने कान्हड येथील ३३ केव्ही केंद्रांवर अधिकचा भार पडत आहे़ यामुळे रोहित्रात वारंवार बिघाड होत आहे़ त्यातच शनिवारी रोहित्रात बिघाड झाल्याने अनेक गावांवर विजेचे संकट ओढवले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण