शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:52 IST

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़

ठळक मुद्देबोंडअळीचे अनुदान : दुसरा टप्पा रखडल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़२०१६-१७ च्या खरीप हंगामामध्ये बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता़ त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले़ त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले़ या शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले़ महसूल प्रशासनाने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाकडे नुकसानीचा अहवाल पाठविला होता़ या अहवालानंतर राज्य शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तीन टप्प्यात अनुदान वाटप केले जाईल, असे जाहीर केले़ त्यानुसार जिल्ह्यासाठी ४२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते़ महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या यादीनुसार अनुदानाचे वाटप केले़ परभणी जिल्ह्यात ८४८ गावे असून, या सर्व गावांमध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे़ जिल्हा प्रशासनाला ४२ कोटी रुपयांचा पहिला टप्पा प्राप्त झाल्या नंतर प्रशासनाने अनुदान वाटपास प्रारंभ केला़ ८४८ पैकी २९८ गावांमध्ये बोंडअळीचे अनुदान वाटप झाले आहे़ अनुदान वाटपाचा अहवालही राज्य शासनाकडे पाठवून एक महिन्याचा कालावधी उलटला़ परंतु, दुसरा टप्पा अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाही़---१५७ कोटींची केली मागणीमहसूल प्रशासनाने बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे केल्यानंतर जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती़ विशेष म्हणजे शासनाने ही मागणी मंजूरही केली आहे़ तीन समान टप्प्यात अनुदान वितरित केले जाईल़ पहिला टप्पा प्राप्त झाल्यानंतर संबंधित गावांतील सर्व शेतकºयांचे अनुदान वाटप करावे, अशा पद्धतीने टप्प्या टप्प्याने सर्व शेतकºयांना अनुदान वाटप करावे, अशा सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार पहिल्या टप्प्यात २९८ गावांमधील शेतकºयांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे़८६ हजार शेतकºयांनाच लाभपरभणी जिल्ह्यात बोंडअळीने कापसाचे नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या ३ लाख ५१ हजार १४८ एवढी आहे़ या शेतकºयांना नुकसानीपोटी १५७ कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक आहे़ प्रत्यक्षात ४२ कोटी रुपयेच प्राप्त झाले असून, ८६ हजार ७४३ शेतकºयांनाच हे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसfundsनिधीFarmerशेतकरी