शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:52 IST

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़

ठळक मुद्देबोंडअळीचे अनुदान : दुसरा टप्पा रखडल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़२०१६-१७ च्या खरीप हंगामामध्ये बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता़ त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले़ त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले़ या शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले़ महसूल प्रशासनाने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाकडे नुकसानीचा अहवाल पाठविला होता़ या अहवालानंतर राज्य शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तीन टप्प्यात अनुदान वाटप केले जाईल, असे जाहीर केले़ त्यानुसार जिल्ह्यासाठी ४२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते़ महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या यादीनुसार अनुदानाचे वाटप केले़ परभणी जिल्ह्यात ८४८ गावे असून, या सर्व गावांमध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे़ जिल्हा प्रशासनाला ४२ कोटी रुपयांचा पहिला टप्पा प्राप्त झाल्या नंतर प्रशासनाने अनुदान वाटपास प्रारंभ केला़ ८४८ पैकी २९८ गावांमध्ये बोंडअळीचे अनुदान वाटप झाले आहे़ अनुदान वाटपाचा अहवालही राज्य शासनाकडे पाठवून एक महिन्याचा कालावधी उलटला़ परंतु, दुसरा टप्पा अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाही़---१५७ कोटींची केली मागणीमहसूल प्रशासनाने बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे केल्यानंतर जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती़ विशेष म्हणजे शासनाने ही मागणी मंजूरही केली आहे़ तीन समान टप्प्यात अनुदान वितरित केले जाईल़ पहिला टप्पा प्राप्त झाल्यानंतर संबंधित गावांतील सर्व शेतकºयांचे अनुदान वाटप करावे, अशा पद्धतीने टप्प्या टप्प्याने सर्व शेतकºयांना अनुदान वाटप करावे, अशा सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार पहिल्या टप्प्यात २९८ गावांमधील शेतकºयांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे़८६ हजार शेतकºयांनाच लाभपरभणी जिल्ह्यात बोंडअळीने कापसाचे नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या ३ लाख ५१ हजार १४८ एवढी आहे़ या शेतकºयांना नुकसानीपोटी १५७ कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक आहे़ प्रत्यक्षात ४२ कोटी रुपयेच प्राप्त झाले असून, ८६ हजार ७४३ शेतकºयांनाच हे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसfundsनिधीFarmerशेतकरी