शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:52 IST

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़

ठळक मुद्देबोंडअळीचे अनुदान : दुसरा टप्पा रखडल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़२०१६-१७ च्या खरीप हंगामामध्ये बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता़ त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले़ त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले़ या शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले़ महसूल प्रशासनाने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाकडे नुकसानीचा अहवाल पाठविला होता़ या अहवालानंतर राज्य शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तीन टप्प्यात अनुदान वाटप केले जाईल, असे जाहीर केले़ त्यानुसार जिल्ह्यासाठी ४२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते़ महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या यादीनुसार अनुदानाचे वाटप केले़ परभणी जिल्ह्यात ८४८ गावे असून, या सर्व गावांमध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे़ जिल्हा प्रशासनाला ४२ कोटी रुपयांचा पहिला टप्पा प्राप्त झाल्या नंतर प्रशासनाने अनुदान वाटपास प्रारंभ केला़ ८४८ पैकी २९८ गावांमध्ये बोंडअळीचे अनुदान वाटप झाले आहे़ अनुदान वाटपाचा अहवालही राज्य शासनाकडे पाठवून एक महिन्याचा कालावधी उलटला़ परंतु, दुसरा टप्पा अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाही़---१५७ कोटींची केली मागणीमहसूल प्रशासनाने बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे केल्यानंतर जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती़ विशेष म्हणजे शासनाने ही मागणी मंजूरही केली आहे़ तीन समान टप्प्यात अनुदान वितरित केले जाईल़ पहिला टप्पा प्राप्त झाल्यानंतर संबंधित गावांतील सर्व शेतकºयांचे अनुदान वाटप करावे, अशा पद्धतीने टप्प्या टप्प्याने सर्व शेतकºयांना अनुदान वाटप करावे, अशा सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार पहिल्या टप्प्यात २९८ गावांमधील शेतकºयांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे़८६ हजार शेतकºयांनाच लाभपरभणी जिल्ह्यात बोंडअळीने कापसाचे नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या ३ लाख ५१ हजार १४८ एवढी आहे़ या शेतकºयांना नुकसानीपोटी १५७ कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक आहे़ प्रत्यक्षात ४२ कोटी रुपयेच प्राप्त झाले असून, ८६ हजार ७४३ शेतकºयांनाच हे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसfundsनिधीFarmerशेतकरी