शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

विजेच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST

जिल्ह्यातील नद्यांमध्ये वाढली अस्वच्छता परभणी : जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात नद्या प्रवाही ...

जिल्ह्यातील नद्यांमध्ये वाढली अस्वच्छता

परभणी : जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात नद्या प्रवाही असल्याने काही प्रमाणात प्रदूषण कमी झाले होते. मात्र, नदीपात्रातील पाणी कमी झाले असून, गाव परिसरातील कचरा, तसेच टाकाऊ वस्तू नदीपात्रात फेकल्या जातात. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढत आहे. शिवाय अवैध वाळू उपशामुळे नद्यांना डबक्याचे स्वरूप आले असून, पाणी प्रदूषित झाले आहे.

टरबूज, खरबुजांची वाढली आवक

परभणी : उन्हाळ्याला प्रारंभ होताच टरबूज आणि खरबुजांना मोठी मागणी वाढते. येथील बाजारपेठेतही टरबुजांची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे, द्राक्षे, चिकू या फळांचीही आवक वाढली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात चिकूची लागवड केली जात असून, उत्पादित माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता फळांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बसपोर्टचे काम गतीने सुरू

परभणी : येथील बस स्थानक भागात बसपोर्टचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांपासून बिलाअभावी हे काम ठप्प पडले होते. त्यामुळे बसपोर्टची उभारणी वेळेत होते की नाही, अशी शंका प्रवाशांत व्यक्त केली जात होती. मात्र, महामंडळ प्रशासनाने कंत्राटदाराचे बिल अदा केल्याने आता हे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने निधी अभावी काम बंद पडू नये, यासाठी आधीच निधीची तरतूद करुन ठेवावी, अशी जिल्हावासीयांची मागणी आहे.

जिल्हा स्टेडियममधील स्वच्छतागृह बंद

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील स्वच्छतागृह बंद असल्याने खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. स्टेडियम परिसरात अद्ययावत असे स्वच्छतागृह उभारण्यात आले. मात्र, या स्वच्छतागृहाची देखभाल केली जात नसल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खेळाडूंची कुचंबणा होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी स्टेडियम भागातील स्वच्छतागृह सुरू करावे, अशी मागणी खेळाडूंतून केली जात आहे.

रब्बीचा शेतमाल घरातच पडून

परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली असून, शेतमाल सध्या तरी घरातच पडून आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्याने, त्याचा परिणाम बाजार समितीच्या कारभारावर झाला आहे. बाजार समिती भागात मोठ्या प्रमाणात आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणी सहन कराव्या लागत आहेत.