शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

तुडुंब गोदावरीत शेतकरी बसले उपोषणाला; तहसीलदार म्हणाले, फोटोसेशन झालं असेल तर...

By मारोती जुंबडे | Updated: February 20, 2025 17:21 IST

आंदोलन मागे घेण्यासाठी तहसीलदार माधव बोथीकर यांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधला होता,

परभणी: राज्य सरकारने पिकविमा कंपनीला ९९ कोटींची थकीत असलेली सबसिडी तत्काळ वर्ग करावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गोदावरी नदीपात्रात गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १८ जानेवारी रोजी राज्य शासनाकडे थकीत असलेली ९९ कोटींची विमा कंपनीची रक्कम तत्काळ खात्यावर वर्ग करावी, या प्रमुख मागणीसाठी धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर व जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंदोलकांना शब्द देऊन ८ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले होते.

मात्र, २३ दिवसानंतर ही विमा कंपनीला राज्य शासनाचे पैसे वर्ग झाले नाही. परिणामी, जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांचे ३३५ कोटी रुपयांचा आग्रीम अडकून पडला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २० फेब्रुवारी पासून धानोरा काळे येथील तुडुंब भरलेल्या गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोंढे, कैलास काळे, माऊली शिंदे, नागेश दुधाटे, तुकाराम दुधाटे, विष्णू दुधाटे, माणिक दुधाटे आदींचा सहभाग आहे.

तहसीलदारांनी वाढविला आंदोलकांचा संतापशेतकऱ्यांना तत्काळ ३३५ कोटी रुपयांचा आग्रीम मिळावा, यासाठी किशोर ढगे यांच्यासह इतरांचे आंदोलन गोदावरी नदी पात्रात सुरू आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी तहसीलदार माधव बोथीकर यांनी गुरुवारी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधला. मात्र यावेळी बोलताना तुमचे फोटो सेशन झाले असेल, तर हे आंदोलन मागे घ्या असे शब्द वापरले. त्यामुळे आंदोलनकर्ते संतापले. जोपर्यंत तहसीलदारांवर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आता आंदोलन मागे घेणार नाहीत असा पवित्रा यावेळी घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांचा शब्द हवेत१८ जानेवारी रोजी धानोरा काळे येथे अनेक आंदोलनकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल, असा शब्द दिला होता. मात्र प्रश्न मार्गी लागला नाही. उलट आंदोलनकर्त्यांवर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. परिणामी २३ दिवसानंतर पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुडुंब भरलेल्या गोदावरी नदी पात्रात उपोषण सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Schemeकृषी योजनाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी