शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

तुडुंब गोदावरीत शेतकरी बसले उपोषणाला; तहसीलदार म्हणाले, फोटोसेशन झालं असेल तर...

By मारोती जुंबडे | Updated: February 20, 2025 17:21 IST

आंदोलन मागे घेण्यासाठी तहसीलदार माधव बोथीकर यांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधला होता,

परभणी: राज्य सरकारने पिकविमा कंपनीला ९९ कोटींची थकीत असलेली सबसिडी तत्काळ वर्ग करावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गोदावरी नदीपात्रात गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १८ जानेवारी रोजी राज्य शासनाकडे थकीत असलेली ९९ कोटींची विमा कंपनीची रक्कम तत्काळ खात्यावर वर्ग करावी, या प्रमुख मागणीसाठी धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर व जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंदोलकांना शब्द देऊन ८ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले होते.

मात्र, २३ दिवसानंतर ही विमा कंपनीला राज्य शासनाचे पैसे वर्ग झाले नाही. परिणामी, जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांचे ३३५ कोटी रुपयांचा आग्रीम अडकून पडला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २० फेब्रुवारी पासून धानोरा काळे येथील तुडुंब भरलेल्या गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोंढे, कैलास काळे, माऊली शिंदे, नागेश दुधाटे, तुकाराम दुधाटे, विष्णू दुधाटे, माणिक दुधाटे आदींचा सहभाग आहे.

तहसीलदारांनी वाढविला आंदोलकांचा संतापशेतकऱ्यांना तत्काळ ३३५ कोटी रुपयांचा आग्रीम मिळावा, यासाठी किशोर ढगे यांच्यासह इतरांचे आंदोलन गोदावरी नदी पात्रात सुरू आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी तहसीलदार माधव बोथीकर यांनी गुरुवारी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधला. मात्र यावेळी बोलताना तुमचे फोटो सेशन झाले असेल, तर हे आंदोलन मागे घ्या असे शब्द वापरले. त्यामुळे आंदोलनकर्ते संतापले. जोपर्यंत तहसीलदारांवर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आता आंदोलन मागे घेणार नाहीत असा पवित्रा यावेळी घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांचा शब्द हवेत१८ जानेवारी रोजी धानोरा काळे येथे अनेक आंदोलनकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल, असा शब्द दिला होता. मात्र प्रश्न मार्गी लागला नाही. उलट आंदोलनकर्त्यांवर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. परिणामी २३ दिवसानंतर पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुडुंब भरलेल्या गोदावरी नदी पात्रात उपोषण सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Schemeकृषी योजनाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी