शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST

परभणी : निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, तरच भरघोस उत्पादन घेणे शक्य ...

परभणी : निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, तरच भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शक, वित्तीय सल्लागार दिलीप देशमुख यांनी केले.

परभणी येथील सक्सेस कॉटन इंडस्ट्रीज व श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठान, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतमाल विक्री व्यवस्थापन आणि त्यामधील व्यवसायाच्या संधी’ या विषयावर नुकतेच व्याख्यान पार पडले. याप्रसंगी देशमुख बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, वाई-सातारा येथील दीपज्योती फाउंडेशनच्या दीपाताई घाटगे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, सक्सेस कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक मुरलीधर डाके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यानी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी एकत्र येऊन पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे. उत्पन्नासह शेतीमालाचा उच्च दर्जा राखावा. बाजारपेठेचा अभ्यास करताना शेतीमालाचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून अधिक नफा कसा मिळवता येईल, याकडे लक्ष द्यावे. पारंपरिक शिक्षण कालबाह्य झाले असून, सद्य:स्थितीत ६२२ व्यवसायांमध्ये करिअर करता येऊ शकते. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कारही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले, पीक पद्धतीत जोपर्यंत बदल केला जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. शेतकऱ्यांनी जे विकतं ते पिकवून गुणात्मक बदल करीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. रामप्रसाद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी सविता डाके, श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या मालेवार, सचिव अण्णासाहेब सोनवणे, प्रा. अशोक राख, विलास जैन, पंकज पाटील, अनंत डुकरे, सुरेश हिवाळे, प्रसाद लेंगुळे, शिवराम खेडूळकर, महेश खाकरे आदींनी प्रयत्न केले.

उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश डागा, उदय कत्रुवार, नारायण धस, मेघाताई देशमुख, गोविंद अजमेरा, नितीन लोहट, ॲड. अशोक सोनी, अशोक राख आदींचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या दीपाताई घाटगे यांनी सातारा जिल्ह्यात २००३ पासून करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील ६५० बचत गट त्यांनी तयार केले असून, ९५० प्रकारचे विविध व्यवसाय प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.