शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST

परभणी : निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, तरच भरघोस उत्पादन घेणे शक्य ...

परभणी : निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, तरच भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शक, वित्तीय सल्लागार दिलीप देशमुख यांनी केले.

परभणी येथील सक्सेस कॉटन इंडस्ट्रीज व श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठान, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतमाल विक्री व्यवस्थापन आणि त्यामधील व्यवसायाच्या संधी’ या विषयावर नुकतेच व्याख्यान पार पडले. याप्रसंगी देशमुख बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, वाई-सातारा येथील दीपज्योती फाउंडेशनच्या दीपाताई घाटगे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, सक्सेस कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक मुरलीधर डाके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यानी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी एकत्र येऊन पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे. उत्पन्नासह शेतीमालाचा उच्च दर्जा राखावा. बाजारपेठेचा अभ्यास करताना शेतीमालाचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून अधिक नफा कसा मिळवता येईल, याकडे लक्ष द्यावे. पारंपरिक शिक्षण कालबाह्य झाले असून, सद्य:स्थितीत ६२२ व्यवसायांमध्ये करिअर करता येऊ शकते. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कारही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले, पीक पद्धतीत जोपर्यंत बदल केला जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. शेतकऱ्यांनी जे विकतं ते पिकवून गुणात्मक बदल करीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. रामप्रसाद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी सविता डाके, श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या मालेवार, सचिव अण्णासाहेब सोनवणे, प्रा. अशोक राख, विलास जैन, पंकज पाटील, अनंत डुकरे, सुरेश हिवाळे, प्रसाद लेंगुळे, शिवराम खेडूळकर, महेश खाकरे आदींनी प्रयत्न केले.

उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश डागा, उदय कत्रुवार, नारायण धस, मेघाताई देशमुख, गोविंद अजमेरा, नितीन लोहट, ॲड. अशोक सोनी, अशोक राख आदींचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या दीपाताई घाटगे यांनी सातारा जिल्ह्यात २००३ पासून करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील ६५० बचत गट त्यांनी तयार केले असून, ९५० प्रकारचे विविध व्यवसाय प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.