शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST

परभणी : निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, तरच भरघोस उत्पादन घेणे शक्य ...

परभणी : निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, तरच भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शक, वित्तीय सल्लागार दिलीप देशमुख यांनी केले.

परभणी येथील सक्सेस कॉटन इंडस्ट्रीज व श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठान, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतमाल विक्री व्यवस्थापन आणि त्यामधील व्यवसायाच्या संधी’ या विषयावर नुकतेच व्याख्यान पार पडले. याप्रसंगी देशमुख बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, वाई-सातारा येथील दीपज्योती फाउंडेशनच्या दीपाताई घाटगे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, सक्सेस कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक मुरलीधर डाके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यानी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी एकत्र येऊन पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे. उत्पन्नासह शेतीमालाचा उच्च दर्जा राखावा. बाजारपेठेचा अभ्यास करताना शेतीमालाचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून अधिक नफा कसा मिळवता येईल, याकडे लक्ष द्यावे. पारंपरिक शिक्षण कालबाह्य झाले असून, सद्य:स्थितीत ६२२ व्यवसायांमध्ये करिअर करता येऊ शकते. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कारही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले, पीक पद्धतीत जोपर्यंत बदल केला जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. शेतकऱ्यांनी जे विकतं ते पिकवून गुणात्मक बदल करीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. रामप्रसाद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी सविता डाके, श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या मालेवार, सचिव अण्णासाहेब सोनवणे, प्रा. अशोक राख, विलास जैन, पंकज पाटील, अनंत डुकरे, सुरेश हिवाळे, प्रसाद लेंगुळे, शिवराम खेडूळकर, महेश खाकरे आदींनी प्रयत्न केले.

उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश डागा, उदय कत्रुवार, नारायण धस, मेघाताई देशमुख, गोविंद अजमेरा, नितीन लोहट, ॲड. अशोक सोनी, अशोक राख आदींचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या दीपाताई घाटगे यांनी सातारा जिल्ह्यात २००३ पासून करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील ६५० बचत गट त्यांनी तयार केले असून, ९५० प्रकारचे विविध व्यवसाय प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.