शहरं
Join us  
Trending Stories
1
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
2
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
3
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
4
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
5
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
6
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
7
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
8
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
9
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
10
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
11
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
12
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
13
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
14
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
15
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
16
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
17
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
18
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
19
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
20
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा जाऊन हिवाळा आला; तरी ही सेलू येथील शेतक-यांना पाणीस्त्रोत अधिग्रहणाचा मोबदला मिळेना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 18:33 IST

उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही.

सेलू (परभणी) :  उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. मोबदला मिळावा या साठी १४ गावातील २१ शेतक-यांना पंचायत समितीच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.

सेलू तालुक्यातील हट्टा, कुडा, लाडनांद्रा, मापा, राव्हा, कान्हड, गव्हा, आडगाव,तांदूळवाडी, पार्डी, कौसडी, हादगाव, जळवा जिवाजी, रायपूर, वलंगवाडी या गावात खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. तर नागठाणा, डिग्रस जहागीर, गुळखंड, पिंपळगाव गोसावी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. एप्रिल महिन्यात तालुक्यातील १८ गावातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.

यातील ४ गावाना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. प्रशासनाने उर्वरित १४ गावातील २१ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला होता. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात १४ गावातील खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. त्याद्वारे ग्रामपंचायतींनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला होता. गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतक-यांनी उपलब्ध पाण्याचे स्त्रोत अधिग्रहणासाठी दिले. मात्र सहा महिने उलटूनही अधिग्रहणाचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. कान्हड या गावात दोन खाजगी पाणीस्त्रोत अधिग्रहण करण्यात आले होते. तर रायपूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावातील ५ पाण्याचे स्त्रोत तसेच जवळा येथे ३ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता.

१४ गावातील २१ शेतक-यांचे जवळपास २ लाख ८४ हजार रुपयांच्या अधिग्रहणाचा मोबदला रखडला आहे. तसेच टँकरचेही ४ लाखाहून अधिक बिल अदा करण्यात आले नाही. दरम्यान, उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. परंतु, ज्या शेतक-यांचे पाणीस्त्रोत अधिग्रहण केले. त्या शेतक-यांना मोबदला देताना विलंब होत असल्यामुळे त्या शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काही शेतकºयांनी शेतातील पिकांना पाणी न देता गावातील टंचाई लक्षात घेऊन पाणीस्त्रोत गावासाठी उपलब्ध करून दिले होते. 

रक्कम मिळताच मोबदला देण्यात येईल तालुक्यातील १४ गावात २१ स्त्रोत अधिग्रहण करून तीन महिने पाणीपुरवठा करण्यात आला होता. या शेतक-यांच्या अधिग्रहणाचा मोबदला देण्यासाठी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालयात रक्कम मिळताच संबंधित शेतक-यांच्या खात्यावर अधिग्रहणाचा मोबदला दिली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे यु.बी. जाधव यांनी दिली. 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी