शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा जाऊन हिवाळा आला; तरी ही सेलू येथील शेतक-यांना पाणीस्त्रोत अधिग्रहणाचा मोबदला मिळेना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 18:33 IST

उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही.

सेलू (परभणी) :  उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. मोबदला मिळावा या साठी १४ गावातील २१ शेतक-यांना पंचायत समितीच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.

सेलू तालुक्यातील हट्टा, कुडा, लाडनांद्रा, मापा, राव्हा, कान्हड, गव्हा, आडगाव,तांदूळवाडी, पार्डी, कौसडी, हादगाव, जळवा जिवाजी, रायपूर, वलंगवाडी या गावात खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. तर नागठाणा, डिग्रस जहागीर, गुळखंड, पिंपळगाव गोसावी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. एप्रिल महिन्यात तालुक्यातील १८ गावातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.

यातील ४ गावाना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. प्रशासनाने उर्वरित १४ गावातील २१ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला होता. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात १४ गावातील खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. त्याद्वारे ग्रामपंचायतींनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला होता. गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतक-यांनी उपलब्ध पाण्याचे स्त्रोत अधिग्रहणासाठी दिले. मात्र सहा महिने उलटूनही अधिग्रहणाचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. कान्हड या गावात दोन खाजगी पाणीस्त्रोत अधिग्रहण करण्यात आले होते. तर रायपूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावातील ५ पाण्याचे स्त्रोत तसेच जवळा येथे ३ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता.

१४ गावातील २१ शेतक-यांचे जवळपास २ लाख ८४ हजार रुपयांच्या अधिग्रहणाचा मोबदला रखडला आहे. तसेच टँकरचेही ४ लाखाहून अधिक बिल अदा करण्यात आले नाही. दरम्यान, उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. परंतु, ज्या शेतक-यांचे पाणीस्त्रोत अधिग्रहण केले. त्या शेतक-यांना मोबदला देताना विलंब होत असल्यामुळे त्या शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काही शेतकºयांनी शेतातील पिकांना पाणी न देता गावातील टंचाई लक्षात घेऊन पाणीस्त्रोत गावासाठी उपलब्ध करून दिले होते. 

रक्कम मिळताच मोबदला देण्यात येईल तालुक्यातील १४ गावात २१ स्त्रोत अधिग्रहण करून तीन महिने पाणीपुरवठा करण्यात आला होता. या शेतक-यांच्या अधिग्रहणाचा मोबदला देण्यासाठी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालयात रक्कम मिळताच संबंधित शेतक-यांच्या खात्यावर अधिग्रहणाचा मोबदला दिली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे यु.बी. जाधव यांनी दिली. 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी