शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

पावसाळा जाऊन हिवाळा आला; तरी ही सेलू येथील शेतक-यांना पाणीस्त्रोत अधिग्रहणाचा मोबदला मिळेना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 18:33 IST

उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही.

सेलू (परभणी) :  उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. मोबदला मिळावा या साठी १४ गावातील २१ शेतक-यांना पंचायत समितीच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.

सेलू तालुक्यातील हट्टा, कुडा, लाडनांद्रा, मापा, राव्हा, कान्हड, गव्हा, आडगाव,तांदूळवाडी, पार्डी, कौसडी, हादगाव, जळवा जिवाजी, रायपूर, वलंगवाडी या गावात खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. तर नागठाणा, डिग्रस जहागीर, गुळखंड, पिंपळगाव गोसावी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. एप्रिल महिन्यात तालुक्यातील १८ गावातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.

यातील ४ गावाना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. प्रशासनाने उर्वरित १४ गावातील २१ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला होता. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात १४ गावातील खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. त्याद्वारे ग्रामपंचायतींनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला होता. गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतक-यांनी उपलब्ध पाण्याचे स्त्रोत अधिग्रहणासाठी दिले. मात्र सहा महिने उलटूनही अधिग्रहणाचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. कान्हड या गावात दोन खाजगी पाणीस्त्रोत अधिग्रहण करण्यात आले होते. तर रायपूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावातील ५ पाण्याचे स्त्रोत तसेच जवळा येथे ३ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता.

१४ गावातील २१ शेतक-यांचे जवळपास २ लाख ८४ हजार रुपयांच्या अधिग्रहणाचा मोबदला रखडला आहे. तसेच टँकरचेही ४ लाखाहून अधिक बिल अदा करण्यात आले नाही. दरम्यान, उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. परंतु, ज्या शेतक-यांचे पाणीस्त्रोत अधिग्रहण केले. त्या शेतक-यांना मोबदला देताना विलंब होत असल्यामुळे त्या शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काही शेतकºयांनी शेतातील पिकांना पाणी न देता गावातील टंचाई लक्षात घेऊन पाणीस्त्रोत गावासाठी उपलब्ध करून दिले होते. 

रक्कम मिळताच मोबदला देण्यात येईल तालुक्यातील १४ गावात २१ स्त्रोत अधिग्रहण करून तीन महिने पाणीपुरवठा करण्यात आला होता. या शेतक-यांच्या अधिग्रहणाचा मोबदला देण्यासाठी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालयात रक्कम मिळताच संबंधित शेतक-यांच्या खात्यावर अधिग्रहणाचा मोबदला दिली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे यु.बी. जाधव यांनी दिली. 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी