शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

पावसाळा जाऊन हिवाळा आला; तरी ही सेलू येथील शेतक-यांना पाणीस्त्रोत अधिग्रहणाचा मोबदला मिळेना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 18:33 IST

उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही.

सेलू (परभणी) :  उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. मोबदला मिळावा या साठी १४ गावातील २१ शेतक-यांना पंचायत समितीच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.

सेलू तालुक्यातील हट्टा, कुडा, लाडनांद्रा, मापा, राव्हा, कान्हड, गव्हा, आडगाव,तांदूळवाडी, पार्डी, कौसडी, हादगाव, जळवा जिवाजी, रायपूर, वलंगवाडी या गावात खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. तर नागठाणा, डिग्रस जहागीर, गुळखंड, पिंपळगाव गोसावी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. एप्रिल महिन्यात तालुक्यातील १८ गावातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.

यातील ४ गावाना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. प्रशासनाने उर्वरित १४ गावातील २१ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला होता. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात १४ गावातील खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. त्याद्वारे ग्रामपंचायतींनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला होता. गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतक-यांनी उपलब्ध पाण्याचे स्त्रोत अधिग्रहणासाठी दिले. मात्र सहा महिने उलटूनही अधिग्रहणाचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. कान्हड या गावात दोन खाजगी पाणीस्त्रोत अधिग्रहण करण्यात आले होते. तर रायपूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावातील ५ पाण्याचे स्त्रोत तसेच जवळा येथे ३ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता.

१४ गावातील २१ शेतक-यांचे जवळपास २ लाख ८४ हजार रुपयांच्या अधिग्रहणाचा मोबदला रखडला आहे. तसेच टँकरचेही ४ लाखाहून अधिक बिल अदा करण्यात आले नाही. दरम्यान, उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. परंतु, ज्या शेतक-यांचे पाणीस्त्रोत अधिग्रहण केले. त्या शेतक-यांना मोबदला देताना विलंब होत असल्यामुळे त्या शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काही शेतकºयांनी शेतातील पिकांना पाणी न देता गावातील टंचाई लक्षात घेऊन पाणीस्त्रोत गावासाठी उपलब्ध करून दिले होते. 

रक्कम मिळताच मोबदला देण्यात येईल तालुक्यातील १४ गावात २१ स्त्रोत अधिग्रहण करून तीन महिने पाणीपुरवठा करण्यात आला होता. या शेतक-यांच्या अधिग्रहणाचा मोबदला देण्यासाठी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालयात रक्कम मिळताच संबंधित शेतक-यांच्या खात्यावर अधिग्रहणाचा मोबदला दिली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे यु.बी. जाधव यांनी दिली. 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी