शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

पाथरीत तूर आणि हरभरा खरेदीचे 6 कोटी 62 लाखाचे चुकारे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:57 IST

शासनाने पाथरी प्रथमच  हमी भावातील तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु केले.मात्र,या केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या तूर आणि हरभरा पिकांचे तब्बल 6 कोटी 62 लाख रुपये चुकारे अद्यापही ही मिळाले नाहीत.

पाथरी (परभणी ) : शासनाने पाथरी प्रथमच  हमी भावातील तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु केले.मात्र,या केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या तूर आणि हरभरा पिकांचे तब्बल 6 कोटी 62 लाख रुपये चुकारे अद्यापही ही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी आपला माल हमी भाव खरेदी केंद्रावर विक्री करून अडचणीत सापडला आहे.

पाथरी तालुक्यासाठी मानवत येथे हमीभाव खरेदी केंद्र ठेवण्यात आले.या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात पाथरी येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेडच्या वतीने हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. यानुसार तूर  5400 तर हरबरा 4400 रुपये दराने खरेदी करण्यात आला. 

या केंद्रावर 18 एप्रिल ते 13 जून या काळात 253 शेतकऱ्यांची 3892 क्विंटल तूर तर 829 शेतकऱ्यांचा 10289 क्विंटल हरभरा बाजार समिती मार्फत खरेदी करण्यात आला. यानुसार तुरीचे 2 कोटी 12 लाख 14 हजार 125 तर हरभऱ्याचे 4 कोटी 52 लाख 3 हजार 400 रुपये चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. 

पहिल्याच वर्षी अडचणपाथरी तालुक्यात या वर्षी पहिल्यांदा च शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले, केंद्र सुरू झाल्यावर शेतकऱ्यांची गैरसोय कमी होईल असे वाटत होते मात्र हमी भावावर घेतलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकरी अधिक च अडचणीत सापडला आहे

शेतकरी अडचणी तशासनाच्या हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकरी चांगला भाव मिळेल म्हणून माल विक्री करण्यास आणतात.मात्र,माल विक्री करून वेळेत रक्कम मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत-अनिल नखाते,सभापती,बाजार समिती, शेतकऱ्यांकडून सतत विचारणाहमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांनि आपला माल विक्री केला, खरेदी नंतर शेतकरी मालाचे चुकारे कधी मिळतील यासाठी वाट पाहत आहेत, सतत विचारणा होत आहे, मात्र अद्याप रक्कम उपलब्ध झाली नाही -बी एस कुटे, सचिव बाजार समिती पाथरी

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रState Governmentराज्य सरकारfundsनिधी